Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीच्या तीव्र वेदना कायमच्या होतील गायब! दैनंदिन आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, फायब्रॉईडच्या गाठी जातील वितळून

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि स्नायू शिथिल होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2026 | 08:07 AM
मासिक पाळीच्या तीव्र वेदना कायमच्या होतील गायब! दैनंदिन आहारात नियमित खा 'हे' पौष्टिक पदार्थ, फायब्रॉईडच्या गाठी जातील वितळून

मासिक पाळीच्या तीव्र वेदना कायमच्या होतील गायब! दैनंदिन आहारात नियमित खा 'हे' पौष्टिक पदार्थ, फायब्रॉईडच्या गाठी जातील वितळून

Follow Us
Follow Us:

पाळीतील वेदना कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहार.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कोणते पदार्थ खाऊ नये?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वेदना का होतात?

सर्वच महिलांना महिन्यातील चार ते पाच दिवस मासिक पाळी येते. हा शरीरातील नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. मासिक पाळी आल्यानंतर स्त्रीच्या गर्भाशयाचे अस्तर योनीमार्गातून रक्तस्त्रावाच्या रूपात बाहेर पडते. साधारणपणे १२ ते १३ वयाच्या मुलींमध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ४५ ते ५० व्या वर्षी मासिक पाळी बंद होते. या दिवसांमध्ये महिलांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. कंबर दुखणे, ओटीपोटात वेदना होणे, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी बऱ्याचदा महिला पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. पण या गोळ्या वारंवार खाल्ल्यास गर्भाशयाला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद

मासिक पाळी आल्यानंतर गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात, ज्याच्या परिणामामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. याशिवाय मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात प्रोस्टाग्लँडिन्स नावाचा घटक तयार होतो, ज्यामुळे सूज आणि वेदना वाढतात. रक्तभिसरण सुरळीत चालू नसल्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त वेदना होतात. तर गर्भाशयात वाढलेल्या फायब्रॉईडच्या गाठी वेदना अधिक तीव्र करतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये आहारात शरीरास सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास वेदनांपासून कायमची सुटका मिळेल.

पाळीतील वेदना कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहार:

स्नायूंना शिथिल करण्यासाठी शरीराला वेगवेगळ्या पोषक घटकांची आणि जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. पालक आणि मेथीमध्ये लोह आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे स्नायूंचे आकुंचन कमी होते आणि वेदना होत नाहीत. पोटॅशियम युक्त केळी नियमित खाल्ल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. अननसामध्ये ब्रोमेलिन असते, ज्यामुळे गर्भाशयाचे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. तसेच मासिक पाळी आल्यानंतर पोटात तीव्र वेदना होत असतील तर आल्याचा चहा प्यावा. आल्याचा चहा प्यायल्यामुळे पोटात वाढलेल्या कळा आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी केशर आणि काळ्या मनुका भिजवून खाल्ल्यास ओटीपोटात वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होते.

Kitchen Garden Tips: पावसाळ्यापूर्वी किचन गार्डनमध्ये लावा या भाज्या, आरोग्यासाठी ठरतील उत्तम

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कोणते पदार्थ खाऊ नये?

दैनंदिन आहारातील काही पदार्थ शरीरात इन्फ्लेमेशन वाढवतात, ज्यामुळे वेदना होण्याची शक्यता असते. जास्त मिठाचे सेवन करणे शरीरासाठी घातक आहे. यामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि शरीराला सूज येण्याची शक्यता असते. कॅफिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि ओटीपोटात ताण वाढतो, ज्याच्या परिणामामुळे वेदना वाढण्याची शक्यता असते. तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ शरीरात गॅस आणि अपचनाच्या समस्या वाढवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळीच्या वेदना जास्त का होतात?

    Ans: मासिक पाळीदरम्यान गर्भाशयाच्या आकुंचनामुळे वेदना होऊ शकतात. हार्मोन्समधील बदल, एंडोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉईडसारख्या समस्यांमुळे काही महिलांना अधिक त्रास होऊ शकतो.

  • Que: फायब्रॉईडच्या गाठी म्हणजे काय?

    Ans: फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये तयार होणाऱ्या सामान्यतः कॅन्सर नसलेल्या गाठी आहेत. काही महिलांमध्ये यामुळे जास्त रक्तस्राव, पोटदुखी किंवा मासिक पाळीच्या वेळी त्रास होऊ शकतो.

  • Que: महिलांनी आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत?

    Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, सुका मेवा, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि लोह व कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.

Web Title: Say goodbye to severe menstrual pain forever regularly include these nutritious foods in your daily diet to dissolve fibroids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:07 AM

Topics:  

  • menstruation health
  • Periods
  • Womens Health

संबंधित बातम्या

Pakistan Period Tax: पाकिस्तान सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय! सॅनिटरी पॅड्स आणि गर्भनिरोधकांवरील 18% टॅक्स केला पूर्णपणे रद्द
1

Pakistan Period Tax: पाकिस्तान सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय! सॅनिटरी पॅड्स आणि गर्भनिरोधकांवरील 18% टॅक्स केला पूर्णपणे रद्द

वयाच्या तिशीतच महिलांना का येतो मेनोपॉज? तरुण वयात मासिक पाळी गेल्यामुळे वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका
2

वयाच्या तिशीतच महिलांना का येतो मेनोपॉज? तरुण वयात मासिक पाळी गेल्यामुळे वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.