
तीन रंगांची ही कथा...! स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर मराठमोळ्या शुभेच्छा
भारताचा राष्ट्रीय सण म्हणजे १५ ऑगस्ट साजरा केला जातो. १९४७ मध्ये आपला देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. यादिवशी देशाला जवळपास दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून व गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाष चंद्र बोस, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल इत्यादींनी त्याग केला. त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आणि संघर्षाची आठवण करून देण्यासाठी खास करून साजरा केला जातो. त्यामुळे यंदाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या नातेवाईक आणि प्रियजनांना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच द्या.(फोटो सौजन्य – istock)
Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तीन रंग प्रतिभेचे नारंगी ,पांढरा आणि
हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी
फडकतातं नव्या उत्साहाने
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे
आज हा दिवस पाहिला. ती आई आहे
भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या
वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गंगा-यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे,
ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे,
कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदूस्थान, माझा हिंदुस्थान
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
१५ ऑगस्ट आला पुन्हा एकदा,
मनात देशभक्ती जागी झाली पुन्हा,
शहीदांना वंदन करतो आज,
त्यांच्यामुळे मिळाले स्वातंत्र्य आज.
भारत माझा देश आहे,
या मातीत जीव माझा आहे,
तिरंगा जेव्हा फडकतो आकाशात,
अभिमान दाटतो माझ्या श्वासात.
स्वातंत्र्याची किंमत विचारा त्यांना,
ज्यांनी गमावले आपले जीवन,
आज आम्ही मोकळे श्वास घेतो,
कारण कोणीतरी दिले बलिदान.
तिरंग्याला सलाम करतो,
देशासाठी जगतो,
स्वातंत्र्यदिनाच्या या दिवशी,
अभिमानाने उभा राहतो.
आजादी मिळाली असे नाही,
कोणी दिली असे नाही,
लाखो जवानांच्या रक्ताने,
ही आजादी कमावली आहे.
भारत माता की जय म्हणताना,
अंगावर काटा येतो,
स्वातंत्र्याच्या या सणाला,
मन प्रफुल्लित होते.
स्वातंत्र्य मिळाले म्हणून सुटलो नाही,
जबाबदारी संपली असे नाही,
देश पुढे नेण्याची जबाबदारी,
आता आपल्या खांद्यावर आहे.
१५ ऑगस्ट म्हणजे फक्त सुट्टी नाही,
हा दिवस त्यागाची आठवण आहे,
शहीदांना वंदन करण्याचा,
हा पवित्र दिवस आहे.तिरंगा फडकतो आकाशात,
अभिमान दाटतो मनात,
या झेंड्यासाठी जगतो,
या झेंड्यासाठी मरतो.
तिरंग्याच्या सावलीत जन्मलो,
तिरंग्याच्या सावलीत वाढलो,
या तिरंग्यासाठी काहीही करायला,
आम्ही नेहमी तयार आहोत.