Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जावयांचं गाव: असं एक गाव जिथे मुली नाही तर मुलं जातात सासरी

मुली सासरी जाण्याची प्रथा ही पुराणकाळापासून सुरु झाली आहे. मात्र असं असलं तरी, काही असे ठिकाणं आहेत जिथे मुली नाही तर मुलं सासरी जातात. कोणती आहेत ही ठिकाण जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 14, 2025 | 04:00 PM
जावयांचं गाव: असं एक गाव जिथे मुली नाही तर मुलं जातात सासरी
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय विवाह संस्कृतीची लोकप्रियता जगभर आहे. यातीलच एक परंपरा म्हणजे लग्नानंतर मुलगी मुलाच्या घरी नांदायला जाते. भारत हा पुरुषप्रधान देश असून मुली सासरी राहतात. असं म्हणतात की, स्त्रियांना दोन्ही घरं सांभाळण्य़ाचं कसब जे निसर्गत: असतं. त्यामुळे सासर आणि माहेर या दोन्ही घरचे नातेसंबंध सांभाळणं स्त्रियांना खूप चांगल्या प्रकारे जमतं. त्यामुळे लग्नानंतर मुली सासरी जाण्याची प्रथा ही पुराणकाळापासून सुरु झाली आहे. मात्र असं असलं तरी, काही असे ठिकाणं आहेत जिथे मुली नाही तर मुलं सासरी जातात.

भारतात अशी दोन ठिकाणं आहेत ज्यांना जावयांचं गाव असं म्हटलं जातं. मेघालयात खासी आणि गारो या आदिवासी जमातीची लोकं डोंगर कपाऱ्यात राहतात. या आदिवासी जमातीत मातृसत्ताक पद्धत आहे. या आदिवासी संस्कृतीत स्त्रियांना विशेष मान दिला जातो. इतर भारतीय संस्कृतीत महिलांना फारसे अधिकार दिले जात नाहीत मात्र या आदिवासी संस्कृतीत स्त्रियांना अधिकार, स्वातंत्र्य आणि सन्मान सर्वाधिक दिला जातो.

‘अशी’ आहे मातृसत्ताक पद्धत

या आदिवासी जमातीमध्ये विवाह संस्कृती देखील तितकीच हटके आहे. लग्नानंतर मुली सासरी जात नाहीत तर मुलं घरजावई होतात. सहासा पाहायला गेलं तर घरजावयाला समाजात फारसा मान दिला जात नाही मात्र खासी आणि गारो या आदिवासी जमातीत घरजावयाचा सन्मान केला जातो. लग्नमध्ये मुलीला घर जमीन दिली जाते. इतकंच नाही तर सगळी संपत्ती देखील मुलींच्या नावे केली जाते. घरच्या संपत्तीमध्ये मुलींना सर्वाधिक हिस्सा दिला जातो. या जमातीत मातृसत्ताक पद्धत असल्या कारणाने कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय महिला घेतात. त्यांच मत अंतिम मानलं जातं. एवढंच नाही तर जन्माला येणारी पिढी ही वडीलांचं नाही तर आईच नाव लावते. मुलगी झाली लक्ष्मी आली असं म्हटलं जातं पण हा विचार खऱ्या अर्थाने मेघालयातील आदिवासी समाजात पाहायला मिळतो. इथे मुलगी जन्माला आली तर आनंद व्यक्त केला जातो. कारण मुलगी परक्याचं धन नाही तर कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जातो. या समाजातील लोकं फार शिकलेले नसले तरी या समाजात महिलांना सर्वात जास्त आदर आणि सन्मान दिला जातो.

याच प्रमाणे आणखी एक गाव म्हणजे उत्तरप्रदेशमधील हिंगुलपूर. या ठिकाणाला जावयांचं गाव म्हटलं जातं. एक काळ असा होता की या गावात स्त्रीभ्रुण हत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या. त्यामुळे आपल्या लेकी वाचण्य़ासाठी या गावाने एक वेगळा निर्णय घेतला. गावातील मुलींचं प्रमाण कमी होऊ नये याकरीता मुलीच्या लग्नानंतर मुलगी सासरी न जाता मुलगा सासरी नांदू लागला. त्यामुळे या गावाला देखील जावयांच गाव असं म्हटलं जातं.

Web Title: Son in laws village in meghalaya among the khasi and garo tribal tribes sons not daughters go to their in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • india
  • lifestlye
  • marraige

संबंधित बातम्या

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा
1

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा

IMD Monsoon Update: आनंदाची बातमी! मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल, केरळमध्ये 26 मे, तर महाराष्ट्रात कधी?
2

IMD Monsoon Update: आनंदाची बातमी! मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल, केरळमध्ये 26 मे, तर महाराष्ट्रात कधी?

US vs China vs India: $100 अब्ज क्लबमध्ये अमेरिकेचीच हवा! महासत्तांना टक्कर देण्यासाठी भारत-चीनचा काय आहे तगडा प्लॅन?
3

US vs China vs India: $100 अब्ज क्लबमध्ये अमेरिकेचीच हवा! महासत्तांना टक्कर देण्यासाठी भारत-चीनचा काय आहे तगडा प्लॅन?

EC announces Phase III : आगामी निवडणुकांपूर्वी ECI अ‍ॅक्शन मोडमध्ये; 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत SIR चा तिसरा टप्पा सुरू
4

EC announces Phase III : आगामी निवडणुकांपूर्वी ECI अ‍ॅक्शन मोडमध्ये; 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत SIR चा तिसरा टप्पा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.