Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर कायमच स्वच्छ राहते. आज आम्ही तुम्हाला दिवसभरात कोणत्या वेळी पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2025 | 05:30 AM
शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील 'या' वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील 'या' वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:
  • पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे आणि तोटे.
  • दिवसभरात किती लिटर पाण्याचे सेवन करावे.
  • दिवसभरात कोणत्या वेळी पाण्याचे सेवन केल्यास शरीराला फायदे होतील.
निरोगी राहण्यासाठी जसे अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे, तितकेच पाणी पिणे सुद्धा आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अनेक लोक तहान लागेल तेव्हा पाणी पितात तर काही लोक तहान भागवण्यासाठी पाच पाच मिनिटांनी पाणी पितात. पण केवळ तहान भागवण्यासाठी नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण अनेक लोक चुकीच्या वेळी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय अनेकांना सकाळी उठल्यानंतर उपाशी भरपूर पाणी पिण्याची सवय असते. पण जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो, रक्तभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात.(फोटो सौजन्य – istock)

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी

पाण्याचे सेवन करताना कायमच योग्य प्रमाणात पाणी प्यावे. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. आयुर्वेदामध्ये पाण्याला विशेष महत्व आहे. पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला दिवसभरात कोणत्या वेळी पाणी प्यायल्यामुळे शरीराला फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दिवसभरात या वेळांमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे मानले जाते.

सकाळी उठल्यानंतर पाण्याचे सेवन करावे:

आयुर्वेदामध्ये सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. उपाशी पोटी पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि पोट स्वच्छ होते. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे पोट साफ होते. याशिवाय शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते आणि त्वचा चमकदार, ग्लोइंग दिसू लागते. याशिवाय पाण्यात तुम्ही लिंबू किंवा मध मिक्स करून सुद्धा पिऊ शकता.

जेवणाआधी पाण्याचे सेवन:

जेवणाच्या अर्धा तास आधी पाण्याचे सेवन केल्यास पचनक्रियेवर चांगले परिणाम दिसून येतात. पण जेवणाआधी भरपूर पाण्याचे सेवन करू नये. यामुळे पचनक्रिया मंदावते. जास्त पाण्याचे सेवन केल्यामुळे पाचक रसांची तीव्रता कमी होते, ज्यामुळे पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतात. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात.

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

अंघोळी आधी पाणी पिण्याचे फायदे:

अनेकांना अंघोळीला जाण्याआधी पाणी पिण्याची सवय असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि हृदयावर जास्तीचा तणाव येत नाही. याशिवाय शरीराचे तापमान अचानक जास्त होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये व्यायाम करण्याआधी पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

पाणी पिण्याची योग्य वेळ:

सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास पाणी प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि पचनक्रिया सुधारते. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि जास्त खाणे टाळता येते.

पाणी पिण्याची योग्य पद्धत:

पाणी नेहमी बसून प्यावे.पाणी घोट-घोट करून प्यावे, एकाचवेळी गटागट पाणी पिऊ नये.गरम किंवा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते, विशेषतः सकाळी.थंड पाणी पिणे टाळावे, विशेषतः सकाळी आणि जेवणानंतर.

पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी?

दिवसभर थोडे-थोडे पाणी पीत राहा, तहान लागल्यावर लगेच पाणी प्या, एकाचवेळी जास्त पाणी पिणे टाळा, गरोदरपणात आणि आजारपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Stay away from serious diseases related to the body forever consume water at these times of the day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • health
  • Health Care Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त
1

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त

कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम
2

कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम

काम- घर आणि ऑफिसच्या धावपळीमुळे हार्मोनल स्ट्रेस वाढला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल
3

काम- घर आणि ऑफिसच्या धावपळीमुळे हार्मोनल स्ट्रेस वाढला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
4

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.