Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel Tips: युद्धात कधीच पराभूत न झालेला भारतातील एकमेव किल्ला! जाणून घ्या या दुर्गाची रंजक कहाणी

Travel Tips: महाराष्ट्रमधील रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या मध्यभागी वसलेला मुरुड जंजिरा किल्ला अनोख्या इतिहासासाठी कायमच ओळखला जातो. हा किल्ला शतकानुशतकांच्या इतिहासात कोणत्याही राजा किंवा साम्राज्याकडून युद्धभूमीवर कधीही जिंकता आला नाही.

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 07, 2026 | 02:18 PM
युद्धात कधीच पराभूत न झालेला भारतातील एकमेव किल्ला! जाणून घ्या या दुर्गाची रंजक कहाणी

युद्धात कधीच पराभूत न झालेला भारतातील एकमेव किल्ला! जाणून घ्या या दुर्गाची रंजक कहाणी

Follow Us
Follow Us:

Travel Tips: भारतात असंख्य ऐतिहासिक किल्ले आहेत, ज्यापैकी प्रत्येकाचे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप आणि इतिहास आहे. तर महाराष्ट्राला गडकिल्ल्यांची परंपराच लाभली आहे आणि असाच एक किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. अरबी समुद्राच्या मध्यभागी वसलेला मुरुड जंजिरा किल्ला त्याच्या अनोख्या इतिहासासाठी ओळखला जातो.(फोटो सौजन्य – istock)

Lifestyle News: द्राक्षांवरील डाउनी मिल्ड्यूचा धोका होणार कमी? क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने आणले ‘डोमिनारिस’

हा भारतातील एकमेव किल्ला आहे, जो त्याच्या शतकानुशतकांच्या इतिहासात कोणत्याही राजा किंवा साम्राज्याकडून युद्धभूमीवर कधीही जिंकला गेला नाही. प्रत्येकाने हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण सर्वजण अयशस्वी ठरले. समुद्राच्या लाटांनी वेढलेला हा किल्ला इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झाला.

मुरुड जंजिरा किल्ल्याच्या बांधकामाचा इतिहास १५ व्या शतकापर्यंत जातो. हा किल्ला सुरुवातीला स्थानिक कोळी मच्छीमारांनी लाकडी आणि मातीच्या कुंपणाचा वापर करून बांधला होता. तो बांधण्याचा मुख्य उद्देश समुद्री चाच्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे हा होता. पण, नंतर अहमदनगर सल्तनतीच्या सिद्दी सेनापतींनी त्यावर कब्जा केला, ज्यानंतर येथे एक मोठा आणि मजबूत दगडी किल्ला बांधण्यात आला.

शत्रू सैन्याला गोंधळात टाकण्यासाठी हा किल्ला एका अनोख्या पद्धतीने बांधण्यात आला होता. मुरुड जंजिराचा मुख्य दरवाजा अशा प्रकारे बांधण्यात आला होता की तो किल्ल्याच्या भिंतींमध्ये लपलेला राहील. शत्रूंना समुद्रातून अनेक किलोमीटर दूरवरूनही हा दरवाजा दिसू शकत नव्हता. शत्रू किल्ल्याजवळ येईपर्यंत, किल्ल्यावरील सैनिक हल्लेखोरांना सहजपणे लक्ष्य करू शकत होते.

या किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व बाजूंनी अरबी समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेला असूनही, किल्ल्याच्या आत दोन मोठे आणि खोल तलाव आहेत. या दोन्ही तलावांमध्ये पिण्यायोग्य गोडे पाणी आहे. शिवाय, किल्ल्याच्या संरक्षणासाठी मजबूत बुरुज बांधण्यात आले होते, ज्यावर ५०० हून अधिक तोफा तैनात करण्यात आल्या होत्या. या तोफा अनेक किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्यांवर सहजपणे मारा करू शकत होत्या. किल्ल्याच्या भिंती जवळपास ४० फूट उंच होत्या, ज्यामुळे शत्रूंना हल्ला करणे शक्य होत नसे.

Health Update: ‘एआय’च्या मदतीने मेंदूविषयक आजारांचे निदान! केईएम रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प

जर तुम्हाला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर वसलेल्या मुरुड जंजिरा किल्ल्याला भेट द्यायची असेल, तर तिथे पोहोचण्याचे सोपे मार्ग आम्ही देतोय . किल्ल्यावर पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बोटीने प्रवास करणे. मुरुड गावाजवळील राजपुरी घाटावरून बोटी आणि मोटरबोटी उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला १५ ते २० मिनिटांत किल्ल्यावर पोहोचवतील. सर्वात जवळची रेल्वे स्थानके रोहा आणि पनवेल आहेत. इथे पोहचण्यासाठी विमानतळ नाही. मुरुड जंजिरा किल्ला या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्हीही या किल्ल्याला हमखास भेट देऊ शकता.

Web Title: Travel tips indias only fort that was never defeated in war discover the fascinating story of this stronghold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Historian
  • History
  • Janjira Fort

संबंधित बातम्या

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक
1

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

Heritage Conservation: ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी राजकीय नेत्यांचा विरोध
2

Heritage Conservation: ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी राजकीय नेत्यांचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.