
कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
सर्दी खोकला होण्याची कारणे?
कोरड्या खोकल्यापासून बचाव करण्यासाठी काय खावे?
पावसाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?
वातावरणात सतत होणारे बदल, व्हायरल, विविध संसर्ग जन्य आजार, धूळ, आहारात होणारे बदल, दूषित पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढू लागतात. यामुळे सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब इत्यादी समस्या उद्भवण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराची खूप जास्त काळजी घेणे फार आवश्यक आहे. वारंवार आजारपणात वाढ झाल्यामुळे दैनंदिन जीवनातील कामे करताना अडथळे निर्माण होतात. थंड पदार्थांच्या सेवनामुळे किंवा साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे सर्दी खोकला होतो. सर्दी लवकरी बरी होते, मात्र खोकला कायमच टिकून राहतो. कोरडा खोकला लवकर बरा होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात खोकला वाढू नये म्हणून शरीराची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. यामुळे आजारपण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. त्यामुळे खोकला टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणे फार आवश्यक आहे. बाहेरून किंवा गर्दीच्या ठिकाणाहून आल्यानंतर सगळ्यात आधी हातपाय स्वच्छ धुवणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे, संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून योग्य अंतर ठेवणे इत्यादी उपाययोजना करणे आवश्यक आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि घसा कोरडा पडत नाही.
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त फळे खावीत. यामध्ये तुम्ही संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा यांसारखे पदार्थ खाऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यास मदत होईल. याशिवाय पावसाळयात अतिथंड पाणी, आईस्क्रीम, थंड पेये किंवा खूप थंड पदार्थ खाणे टाळावे. या पदार्थांच्या सेवनामुळे घशाला सूज येणे किंवा टॉन्सिल होण्याची शक्यता असते. धूम्रपान किंवा धूर असलेल्या वातावरणापासून दूर राहिल्यास खोकल्याचा त्रास कमी होतो आणि आराम मिळतो.
पावसाळ्यात सगळ्यांच्या काहींना काही गरमागरम खाण्याची खूप जास्त इच्छा होते. तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे घशात जळजळ आणि अस्वस्थता लागते. तसेच शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्यास घसा अधिक कोरडा पडून इन्फेक्शन वाढते. त्यामुळे वारंवार येणाऱ्या कोरड्या खोकल्यापासून बचाव करण्यासाठी नियमित गरम पाणी प्यावे. तसेच आल्याचा चहा, आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेला काढा प्यायल्यामुळे खोकला कमी होतो आणि आरोग्य सुधारते. दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.
Ans: ज्यामध्ये कफ निघत नाही आणि सतत घसा खवखवणे, जळजळ किंवा खोकल्याची भावना होते, त्याला कोरडा खोकला म्हणतात.
Ans: सर्दी, धूळ, प्रदूषण, हवामानातील बदल, ऍलर्जी, घशाची जळजळ किंवा संसर्गामुळे कोरडा खोकला होऊ शकतो.
Ans: खोकला अनेक दिवस टिकून राहिल्यास, वाढत असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास, ताप, छातीत दुखणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.