
HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर
मधुमेह झाल्यानंतर कोणती चाचणी केली जाते?
HbA1c चाचणी म्हणजे काय?
दैनंदिन रक्तातील साखरेच्या पातळीशी कसे संबंधित आहेत?
मागील काही वर्षांमध्ये जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने ही लक्षणे गंभीर स्वरूप घेतात आणि आरोग्य बिघडतात. मधुमेह हा कधीही न बरा होणारा आजार आहे. आयुष्यभर कायमच गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेहाची सामान्य लक्षणे दिसू लागल्यानंतर वेळीच चाचण्या करून उपचार करावेत. मधुमेह झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यातून एकदा HbA1c ही एक साधी रक्त चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. ही चाचणी केल्यानंतर सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शवली जाते. चला तर जाणून घेऊया HbA1c चाचणी म्हणजे आणि ही चाचणी कशासाठी केली जाते.
HbA1c हे ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींमधील प्रथिन असलेल्या हिमोग्लोबिनशी ग्लुकोज किती प्रमाणात जोडलेले आहे हे मोजते. तुमच्या रक्तातील साखर जितकी जास्त असेल तितकी तुमची HbA1c टक्केवारी जास्त असते. ५.७ टक्क्यांपेक्षा कमी HbA1c सामान्य मानली जाते तर “५.७ टक्के ते ६.४ टक्क्यांमधील मूल्य हे प्रीडायबिटीज दर्शवते. दोन वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे पुष्टी झालेले ६.५ टक्के किंवा त्याहून अधिक HbA1c हे मधुमेहाचे निदान आहे, असे मानले जाते. मधुमेहाचे निदान झालेल्या व्यक्तींसाठी, HbA1c ७ टक्क्यांपेक्षा कमी ठेवणे हे सामान्य लक्ष्य आहे. पण एखाद्या व्यक्तीला मधुमेह किती काळ आहे आणि इतर आरोग्य समस्यांनुसार तो बदलू शकते.
५% HbA1c म्हणजे सरासरी रक्तातील साखर सुमारे ९७ mg/dL असते.
६% म्हणजे अंदाजे १२६ mg/dL.
७% म्हणजे सुमारे १५४ mg/dL.
८% म्हणजे सरासरी १८३ mg/dL.
केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय
HbA1c मध्ये सुधारणा करण्यासाठी संतुलित पोषण, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, ताण व्यवस्थापन आणि आवश्यकतेनुसार योग्य औषधे घेतल्यास, पातळी लक्षणीयरीत्या सुधारू शकते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी दर तीन ते सहा महिन्यांनी नियमित चाचण्या करून मधुमेहाची तपासणी करावी. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आहे की नाही, याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. रक्तातील साखरेची पातळी कायमच संतुलित ठेवण्यासाठी साखर असलेल्या गोड पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.
Ans: वारंवार लघवी होणे, जास्त तहान आणि भूक लागणे, अकारण वजन कमी होणे
Ans: शरीर इन्सुलिन तयार करत नाही, शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही .
Ans: फायबरयुक्त पदार्थ, पालेभाज्या, कमी गोड फळे, जास्त कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ