
कारण ते जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी पूर्णपणे तयार नसतात. तर दुसरीकडे सुमारे एकवीस वर्षांच्या स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक परिपक्व मानल्या जातात. संशोधनानुसार असं म्हटलं गेलं आहे की, पती आणि पत्नीच्या नात्यामध्ये सहा महिन्याचं किंवा एक दोन वर्षाचं अंतर असेल तर नक्की संघर्ष जास्त का होतात तर त्याला कारणीभूत आहे की त्यांचा टप्पा हा एकच असतो. म्हणजे त्यांचं काम करण्याचं वय किंवा त्यांच्या बाकीच्या गोष्टींचं वय हे same असतं. त्यामुळे त्यांचे संघर्ष, त्यांचा अहंकार हा नात्यामध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाणही वाढतं. या उलट जेव्हा वयामधील अंतर जास्त असतं तेव्हा नवरा अथवा बायको सामंजस्य जास्त प्रमाणात दाखवते. म्हणजे एखादा जर चिडला तर दुसरा गप्प बसतो.
नात्यामध्ये काय महत्त्वाचं आहे हे दोघांपैकी एक जाणून घेतो आणि त्यानंतरच हा संसार टिकवायला मदत होते. संशोधनानुसार असंही दिसून आलं आहे की बरेचदा स्त्रिया या आपल्यापेक्षा जास्त वर्षाच्या पुरुषांना महत्त्व देतात आणि पुरुष जे आहे ते आपल्यापेक्षा किमान पाच सहा वर्षाने लहान असलेल्या मुलींकडे आकर्षित होतात. पण सध्या असंही झालेलं आहे की अनेक स्त्रिया या लहान मुलांकडे आकर्षित होतात आणि अनेक पुरुष हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या स्त्रियांकडे आकर्षित होतात. त्याचं कारणही तेच आहे की नात्यांमध्ये सामंजस्य हे महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर विवाह खरं तर केवळ वयावरती अवलंबून नसो. विवाह टिकवायचा झाला म्हणजेच लग्न जर टिकवायचं झालं तर दोघांचं सामंजस्य, दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. पण arrange marriage करताना किंवा अगदी love marriage करताना सुद्धा बरेचदा वयाचं अंतर हे पाहिलं जातं.