
मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य
मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात?
रक्ताच्या गाठी पडणे योग्य की अयोग्य?
मासिक पाळीच्या चक्रात कशामुळे बदल होतो?
मासिक पाळी येणे ही स्त्रियांच्या शरीरातील नैसर्गिक क्रिया आहे. सामन्याता मासिक पाळी महिन्यातील ४ ते ५ दिवस असते. या दिवसांमध्ये महिलांना असंख्य त्रासांना सामोरे जावे लागते. शरीरातील घाण रक्त मासिक पाळीत शरीराच्या बाहेर पडून जाते. पण शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे, आहारात सतत होणारे बदल आणि मानसिक तणावामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतो. काहीवेळा मासिक पाळी खूप जास्त येते तर काही वेळा पाळी तारीख होऊन गेल्यानंतर येते. अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखी, पाठदुखी, वेदना होणे, रक्तस्त्राव कमी जास्त होणे, रक्ताच्या गाठी पडणे तर काहींना उलट्या, मळमळ होऊन अजिबात खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
मासिक पाळी आल्यानंतर रक्ताच्युअ गाठी पडणे हे अतिशय सामान्य वाटत असेल तरीसुद्धा काहीवेळा महिलांच्या शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. याच समस्येला मेंन्स्ट्रुअल क्लॉट्स असे सुद्धा म्हणतात. रक्ताच्या गाठी पडल्यामुळे कंबर आणि पोटात खूप जास्त वेदना होतात. ज्यावेळी स्त्रियांना मासिक पाळी येते तेव्हा गर्भाशयात जमा झालेले रक्त आणि ऊती यांची जेलीसारखी गाठ तयार होते. याच गाठीमुळे मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त रक्तस्त्राव आणि वेदना होतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गाठी पडणे सामान्य असले तरीसुद्धा ७ दिवसांच्या वर जर रक्ताच्या गाठी पडत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढल्यानंतर मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त रक्तस्त्राव होतो आणि वेदना होतात. पण मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त प्रमाणात रक्ताच्या गाठी पडत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. कारण हे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहेत. रक्ताच्या गाठी जेलीसारख्या असतात. पाळीदरम्यान पडणाऱ्या रक्ताच्या गाठी थायरॉईड, व्हिटॅमिन-बी १२ किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे पडण्याची शक्यता असते. तसेच ओव्हेरियन सिस्ट, हार्मोनल असंतुलन, पीसीओएस आणि फायब्रॉइड्स यांसारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर सुद्धा रक्ताच्या गाठी पडतात.
मासिक पाळीच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमुख कारण म्हणजे एंडोमेट्रिओसिसमध्ये ज्यामध्ये गर्भाशयाचे अस्तर बाहेरून आणि प्रजनन मार्गात वाढू लागते. एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वेदनादायक रक्तस्त्राव आणि मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या होतात. याशिवाय गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल दिसू लागतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्ताच्या गाठी जात असल्यास थकवा, अशक्तपणा, धाप लागणे, छातीत दुखणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.
Ans: होय, लहान आकाराच्या रक्ताच्या गुठळ्या होणे सामान्य आहे, विशेषतः सकाळी उठल्यावर किंवा जड प्रवाहाच्या वेळी.
Ans: जेव्हा मासिक पाळीचा प्रवाह जास्त असतो, तेव्हा शरीरातील नैसर्गिक अँटीकोआगुलंट्स (रक्त गोठण्यापासून रोखणारी द्रव्ये) रक्त वेगाने पातळ करू शकत नाहीत, ज्यामुळे गुठळ्या तयार होतात.
Ans: या गुठळ्या गडद लाल किंवा तपकिरी रंगाच्या दिसू शकतात.