
आयुष्यात कधीच होणार नाही मधुमेह! रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' बदल
मधुमेहाची लक्षणे?
मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे?
मधुमेहाची रुग्ण संख्या वाढण्यामागील कारण?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हा एक गंभीर आणि कधीच बरा न होणारा आजार आहे. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने लक्षणे तीव्र होतात आणि शरीर आतून पोखरून काढतात. रक्तात साखर वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय शरीरावर जखमा होण्याची जास्त शक्यता असते. हातावर किंवा पायावर आलेली लहानशी फोडी जखम तयार करते, ज्याच्या परिणामामुळे हात किंवा संबंधित अवयव कापून टाकावा लागतो. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, वारंवार जंक फूड किंवा गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढण्यासोबतच शरीराला इतर आजारांची सुद्धा लागण होते. वारंवार तहान लागणे, अंगाला सतत खाज येणे, जखमा लवकर बऱ्या न होणे तर काहीवेळा थकवा अशक्तपणा वाढून सतत चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करणे आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बदलांमुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये भरपूर पाणी पिणे फार आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. सतत पाणी प्यायल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय रक्तातील हानिकारक विषारी घटक बाहेर पडून जातात. सामान्य व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी १ ते २ लिटर पाण्याचे सेवन करावे.
रक्तात वाढलेली साखर तीन महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा तपासणे फार आवश्यक आहे. फ्रीस्टाइल लिब्रे यांसारखी उपकरणे रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण अचूक सांगतात. रक्तातील साखरेची पातळी दररोज 24 तासांपैकी 17 तास आयडियल लेव्हलवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीर कायमच निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली करणे फार आवश्यक आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात मेथी दाणे, जांभूळ, फळे आणि इतर पालेभाज्यांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय आहारात आंबट फळे, आवळा, लिंबूवर्गीय फळांचे सेवन करावे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित एक ग्लासभर पाण्यात मेथी दाणे भिजत घालवून त्याचे पाणी उपाशी पोटी प्यावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.
Ans: होय, संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य वजन राखणे आणि निरोगी सवयी यामुळे मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
Ans: कमी साखरयुक्त आहार घेणे, फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे, नियमित शारीरिक हालचाल करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे फायदेशीर ठरू शकते.
Ans: हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी, कडधान्ये, फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा संतुलित प्रमाणात समावेश करावा.