Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात 1865 शाळाबाह्य मुले; ‘अवनि’ संस्थेच्या सर्वेक्षणातून बाब उघड

'अवनि' संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 11 साखर कारखाने व 8 वीटभट्ट्यांवर 4 ते 18 वयोगटातील 1,865 शाळाबाह्य बालके आढळून आली आहेत. यापैकी बहुतांश बालकांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळवून देऊन शिक्षण प्रवाहात आणण्याचे आव्हान असणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 19, 2023 | 12:15 PM
कोल्हापुरात 1865 शाळाबाह्य मुले; ‘अवनि’ संस्थेच्या सर्वेक्षणातून बाब उघड
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : ‘अवनि’ संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 11 साखर कारखाने व 8 वीटभट्ट्यांवर 4 ते 18 वयोगटातील 1,865 शाळाबाह्य बालके आढळून आली आहेत. यापैकी बहुतांश बालकांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळवून देऊन शिक्षण प्रवाहात आणण्याचे आव्हान असणार आहे.

दरवर्षी बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना जिल्ह्यांतून ऊसतोडणीसाठी हजारो कुटुंबे कोल्हापूर जिल्ह्यात स्थलांतरित होतात. या कुटुंबांसमवेत त्यांची लहान मुलेदेखील स्थलांतरित होतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा मूलभूत प्रश्न निर्माण होतो. हंगामी स्थलांतरित बालकांना, बालकामगारांना विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असले, तरी यास म्हणावे असे यश आलेले नाही.

डिसेंबरमध्ये 2023 मध्ये 15 दिवस जिल्ह्याच्या विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 4 ते 6 वयोगटातील 601 बालके, 7 ते 14 वयोगटातील 885 बालके, 15 ते 18 वयोगटातील 679 बालके, अशी 2,165 बालके सर्वेक्षणादरम्यान आढळून आली आहेत. यापैकी सहा साखर कारखाना कार्यस्थळांवर कारखान्यांमार्फत साखर शाळा सुरू आहेत. त्यामध्ये 250 ते 300 बालके शिक्षण घेत आहे. उर्वरित 1,865 बालके शाळाबाह्य असून, त्यांना बालमजूर म्हणून वीटभट्टी व उसाच्या फडात काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.

प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारानुसार, मुलांच्या संख्येनुसार शिक्षक नियुक्ती करण्यात यावी. तसेच त्यांना पाठ्यपुस्तके व दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. दुपारचा पोषण आहार देण्यात यावा. एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी वाहतुकीची सोय करण्यात यावी. यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: 1865 out of school children in kolhapur the matter is revealed through the survey of avani organization nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2023 | 12:15 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • School Students

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.