• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 207 Married Women Ended Her Life In Pune

पुरोगामी पुण्यात 207 ‘वैष्णवीं’नी संपवले जीवन..! छळ ‘ती’चा संपतच नाही…

एकीकडे महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. नोकरी, शाळा तसेच घरात शिरून तिची छेड काढली जाते. शहरी भागातील हे चित्र भयावह आहे. एका उच्च शिक्षीत विवाहितेने त्रासाला कंटाळून गळफास घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2025 | 09:42 AM
पुरोगामी पुण्यात 207 'वैष्णवीं'नी संपवले जीवन..! छळ 'ती'चा संपतच नाही...

पुरोगामी पुण्यात 207 'वैष्णवीं'नी संपवले जीवन..! छळ 'ती'चा संपतच नाही...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे /अक्षय फाटक : कुटुंबियांचा विरोध पत्कारून प्रेम विवाह करणाऱ्या आणि विवाह सोहळ्यात पतीची आणि त्याच्या कुटूंबाची ‘बडदास्त’ सांभाळत कोट्यवधी रुपयांची मुक्त उधळ (हुंडाच) दिल्यानंतरही असाह्य जाच सहन करत शेवटी जीवन संपवणाऱ्या “वैष्णवी”च्या मृत्यूने राज्यभरात हुंडा बळीविरोधात संतापाची लाट पसरली आहे. पण, पुरोगामी पुण्यात पती आणि सासरच्या जाचाला, त्यांच्या टोमन्यांना, हुंड्यासाठी, अनावश्यक डिमांड आणि घर कामावरून बोलणी खात तबल २०७ “वैष्णवीं”नी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुरोगामी, पुढारलेल्या आणि २१ व्या शतकातील पुण्यातील हे भयावह वास्तव आहे. विशेष म्हणजे, वर्षाला साधारण तीनशेहून अधिक गुन्हे हे विवाहितांच्या छळाचे गुन्हे नोंद होत आहेत. त्यामुळे अश्या प्रकरणात कडक शासन होणे, हेच पहिले पाऊल या घटनांना रोखण्यासाठी असेल असे म्हणले जात आहे.

पुण्या-पिंपरी-चिंचवडसारख्या प्रगत व झपाट्याने वाढणाऱ्या शहरातील हे विदारक चित्र आजच्या सुशिक्षीत म्हणविणार्‍या जमाजाचे वास्तव दर्षवत आहे. महिला आज पुरूषाच्या खांद्याला-खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कर्तव्य बजावत आहेत. शासन तसेच विविध सामाजिक संघटनांकडून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांना बळ देण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, आजही महिलांना उंबर्‍याच्या आत ठेवून त्यांच्यावर हक्क गाजविण्याचा पुरूषार्थ मानसिकतेत पुर्णत: बदल झालेला नाही असेच या घटनांवरून दिसत आहे.

एकीकडे महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. नोकरी, शाळा तसेच घरात शिरून तिची छेड काढली जाते. शहरी भागातील हे चित्र भयावह आहे. एका उच्च शिक्षीत विवाहितेने त्रासाला कंटाळून गळफास घेतला. तर, दुसर्‍या घटनेत एका आयटी इंजिनिअर पतीचा त्रास सहन न झाल्याने उच्च शिक्षीत विवाहितेने गळफास लावून जीवन संपवले.

दोनच दिवसांपुर्वी महिन्याभरापुर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रातिनिधीक घटना म्हणून याकडे पाहता येईल. मात्र, सातत्याने सांस्कृतिक व शिक्षणाच्या माहेर घरात या घटना घडत असून, तिचा छळ केला जात आहे.

पोलीस दप्तरी नोंदी झालेल्या या घटना आहेत. पोलिसांपर्यंत न पोहचलेल्यांची संख्याही मोठी आहे. हुंड्यापासून कौटुंबिक हिंसाचार ते अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली कुटूंब विवाहितांचा छळ करत आहेत. प्रथम या विवाहित त्रास सहन करतात. मात्र अतिरेक झाल्यानंतर त्याची वाच्यता होते. आई-वडिल तसेच नातेवाईकांना या गोष्टी सांगितल्या जातात. त्यातून दोन्ही कुटूंबातील वडिलधारी मंडळी एकत्रित येऊन मार्ग काढतात. मात्र, काही दिवस सुखाने गेल्यानंतर पुन्हा छळ सुरू होतो. मग, अशावेळी या विवाहिता सततच्या त्रासाला कंटाळूनजीवन संपवितात, असे काही प्रकरणातून निदर्शनास आले आहे.

पुण्यासारख्या सुसंस्कृत, सांस्कृतिक अन शिक्षणाच्या माहेर घरात गेल्या ९ वर्षात जाचाला कंटाळून २०७ विवाहितांनी जीवन संपविले आहे. अगदी शुल्लक कारणावरून विवाहातांचा छळकरून त्यांना मानसिक व शारिरीक छळ केला जातो.

बीएनएस अंतर्गत कलम १०८ व ८० कायद्यानुसार कडक शिक्षा

भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ८० नुसार, एखाद्या विवाहित महिलेचा मृत्यू विवाहाच्या ७ वर्षांच्या आत जळणे, शारीरिक जखम किंवा संशयास्पद परिस्थितीत झाला असल्यास, व तिच्या मृत्यूपूर्वी तिचा नवरा किंवा त्याचे नातेवाईक हुंड्याच्या मागणीसाठी तिचा छळ किंवा अत्याचार करत असल्याचे सिद्ध झाले, तर ही घटना ‘हुंडाबळी’ म्हणून गणली जाते.

कलमानुसार अशा प्रकरणांत कठोर शिक्षा ठोठावली जाऊ शकते. आरोपी पती किंवा त्याचे नातेवाईक दोषी आढळल्यास त्यांना आजीवन कारावास किंवा किमान ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. बीएनएसअंतर्गत कलम १०८ मध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस आत्महत्या करण्यास उद्युक्त करते किंवा त्यास मदत करते, तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. याअंतर्गत दोषी आढळलेल्या व्यक्तीस १० वर्षांपर्यंतची तुरुंगवास व दंडही होऊ शकतो. या कलमाचा उद्देश मानसिक त्रास, छळ किंवा दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडणाऱ्या घटनांना आळा घालणे हा आहे.

वर्षाला अडीचशे ते तीनशे गुन्हे

पुण्याचा विस्तार वाढला आहे. परराज्यातून व गावातून आलेले कुटूंब उपनगरात वसले आहेत. विवाहितांचा छळाचे जवळपास एका वर्षाच अडीचशे ते तीनशे गुन्हे नोंद होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पोलिसांनी दाखल केलेले किंवा तडजोडीनंतर दाखल झालेले हे गुन्हे आहेत. परंतु, दारूपिऊन मारहाण, त्रास अशा अनेक घटना सातत्याने घडत असल्याचे दिसते.

असाही गैरफायदा…

काही विवाहितांकडून स्वर्थासाठीही महिला कायद्याचा आधार घेऊन पतीसह त्याच्या कुटूंबियाला धमकाविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे काही घटनांमधून समोर आले आहे. पुण्यात गेल्या वर्षात पत्नी व तिच्या कुटूंबियांच्या त्रासाला कंटाळून पतींनी आत्महत्या केल्याचे दोन प्रकार घडलेले आहेत.

ही आहेत, विवाहितांच्या छळाची कारण…

तुला स्वयंपाक येत नाही. लग्नात तुझ्या वडिलांनी आमचा मानपान केला नाही. घर, दुकान तसेच गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण. तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यात अडचणी येत आहेत. तुझ्या मुळे मला येश येत नाही. तर, घरात सतत कोणी तरी आजारी पडत आहे. मुल बाळ होत नाही, चारित्र्यावर संशय तसेच तुझ्या कुटूंबियांनी जादोटोणा केला आहे. यासह अशा अनेक कारणांवरून विवाहितांचा छळ होत असल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारींमधून समोर आले आहे.

नऊ वर्षांत विवाहितांच्या आत्महत्या

२०१७—५४
२०१८—३६
२०१९—१६
२०२०—१९
२०२१—२२
२०२२—१६
२०२३— २०
२०२४— १५
२०२५ (एप्रिल)— ०७

एकूण– २०७

Web Title: 207 married women ended her life in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • Suicide case
  • Vaishnavi hagawane

संबंधित बातम्या

गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं जीवन
1

गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं जीवन

गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…
2

गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…

अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…
3

अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

नागपुरात सफाई कामगाराची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये…
4

नागपुरात सफाई कामगाराची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.