Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai-Nashik Highway Traffic Jam: पावसाचा हाहाकार! मुंबई-नाशिक हायवेवर ८ किलोमीटर वाहतूक कोंडी; हजारो वाहने तासनतास अडकली

मुंबई, ठाणे, भिवंडी आणि वसई-विरारसह अनेक भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर ७ ते ८ किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 01, 2026 | 08:34 PM
मुंबई-नाशिक हायवेवर ८ किलोमीटर वाहतूक कोंडी (Photo Credit- X)

मुंबई-नाशिक हायवेवर ८ किलोमीटर वाहतूक कोंडी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पावसाचा हाहाकार!
  • मुंबई-नाशिक हायवेवर ८ किलोमीटर वाहतूक कोंडी
  • हजारो वाहने तासनतास अडकली
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी आणि वसई-विरारसह अनेक भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर ७ ते ८ किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे, तर वसईमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दोन कार वाहून जाऊन नाल्यात पडल्या. हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर ८ किलोमीटरची वाहतूक कोंडी

भिवंडी तालुक्यात तासनतास पडणाऱ्या पावसाचा परिणाम मुंबई-नाशिक महामार्गावर स्पष्टपणे दिसून येत आहे. अपूर्ण बांधकाम, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर राजनोली, पिंपळनेर आणि मानकोलीपासून खारीगाव टोल नाक्यापर्यंत सुमारे ७ ते ८ किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या दोन-तीन तासांपासून ट्रक, बसेस, खाजगी वाहने आणि इतर गाड्या या कोंडीत अडकल्या आहेत. सततच्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली असून रस्ते अपघातांचा धोका वाढला आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसईमध्ये दोन कार नाल्यात वाहून गेल्या

मुसळधार पावसामुळे वसईच्या वाघराल पाडा भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. डोंगराळ भागातून वेगाने खाली येणाऱ्या पाण्याचा ओघ एका शक्तिशाली प्रवाहात बदलला आणि त्याच्या मार्गात आलेल्या दोन कार वाहून गेल्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एका कारमधील चालक वेळीच बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले होते. पावसाळ्यात नाले, पाणी साचलेले रस्ते आणि दुथडी भरून वाहणाऱ्या जलस्रोतांजवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

School Holiday: मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

‘ऑरेंज अलर्ट’ दरम्यान वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीचा ताण

मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यानंतर, दक्षिण मुंबईतील चाकरमानी लवकर घरी परतताना दिसले. याचा परिणाम वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर स्पष्टपणे दिसून आला, जिथे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाहतूक सुरू असली तरी वाहनांचा वेग मंद आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, संध्याकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाहतुकीची परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा ‘हाय अलर्ट’

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचा, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रशासनाकडून सूचना जारी

सततचा पाऊस आणि ‘हाय अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर पोलीस, बीएमसी (BMC) आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाले आहेत. धोकादायक किंवा सखल भागांवर देखरेख वाढवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, पाणी साचलेल्या ठिकाणी धोका पत्करू नये आणि हवामानविषयक अधिकृत माहितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मुंबई महानगर क्षेत्राला पावसापासून फारसा दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

Navi Mumbai News : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर

Web Title: 8 km traffic jam on mumbai nashik highway thousands of vehicles stranded for hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • mansoon
  • mumbai nashik highway
  • Mumbai Rain
  • traffic jam

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.