Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

80 कोटी लोकांना मोफत धान्य, मग कोणाचा विकास केला? काँग्रेस खासदाराचा भाजपला सवाल

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात 80 कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 76.32% आणि शहरी भागात 45.34% लोकसंख्या लाभार्थी आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 12, 2025 | 09:26 PM
80 कोटी लोकांना मोफत धान्य, मग कोणाचा विकास केला? काँग्रेस खासदाराचा भाजपला सवाल

80 कोटी लोकांना मोफत धान्य, मग कोणाचा विकास केला? काँग्रेस खासदाराचा भाजपला सवाल

Follow Us
Close
Follow Us:

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात 80 कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 76.32% आणि शहरी भागात 45.34% लोकसंख्या लाभार्थी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग 11 वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील रेशनकार्ड धारकांना कोराना काळात मोफत धान्ये देण्यास सुरुवात केली होती. मात्र, कोरोना गेल्यानंतर देखील सरकारकडून या मोफत धान्य योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता, पुढील 5 वर्षांपर्यंत नागरिकांना मोफत धान्य मिळत आहे, त्यावरुन, काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे.

लोकसभेत खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्न क्रमांक 194 अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार महाराष्ट्रातील सुमारे 700.17 लाख व्यक्तींना म्हणजे 7 कोटी 17 लाख नागरिकांना या योजने अंतर्गत मोफत धान्याचा लाभ मिळत आहे. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जानेवारी 2025 मध्ये 3 लाख 83 हजार 766 टन धान्य वाटप करण्यात आले असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 76.32% आणि शहरी भागात 45.34% लोकसंख्या या योजनेंतर्गत समाविष्ट आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य घराणीसाठी Ration Cards वितरित, यामध्ये SC/ST/OBC कुटुंबांचाही समावेश आहे. तर देशभरात 81.35 कोटी लाभार्थ्यांपैकी 80.56 कोटी नागरिकांना मोफत धान्य मिळत आहे.

सरकारची आकडेवारी पाहता केंद्र सरकारच्या विकासाचे मोठे दावे फोल ठरत आहेत. 80 टक्के जनतेला 5 किलो मोफत धान्य द्यावे लागत असेल तर विकास गेला कुठे, मुठभर लोकांचा विकास म्हणजे सर्व समाज घटकांचा विकास नाही. सरकारची आकडेवारीच सांगते आजही बहुसंख्य लोक गरिबीत जीवन जगत आहेत. 2014 पासून देशात गरिब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढत असल्याचे ही आकडेवारीच सांगत असून ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Web Title: 80 crore people free food grains in india country while whose development did the bjp government congress mp varsha gaikwad questions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 09:26 PM

Topics:  

  • indian politics
  • Maharashtra Politics
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
4

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.