
'विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?'; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल
दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठे विधान केले आहे. विद्यार्थी आंदोलानाला ‘अराजकवादी’ आणि ‘फेसलेस’ म्हंटल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आता जोरदार टीका होत असून काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनीही यावरून जोरदार निशाणा साधला आहे.
वर्ष गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे म्हंटले आहे. तसेच “धर्मेंद्र प्रधान यांच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांवर असे शेलके शब्द वापरण्याची तुमची हिंमत कशी झाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वर्षा गायकवाड आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाल्या, “पेपरफुटी, भरतीप्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि उध्वस्त होणाऱ्या भविष्याविरोधात जंतर-मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या देशातील तरुणांना ‘अराजकवादी’ आणि ‘फेसलेस’ ठरवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दांत निषेध करते!”
“तसेच सदाभाऊ खोत यांनी तर लाचारीची हद्द पार करत हक्कासाठी लढणाऱ्या याच सुशिक्षित तरुणांना ‘दहशतवादी’ घोषित करून टाकले. सत्ताधाऱ्यांचे पाय चाटण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांवर असे शेलके शब्द वापरण्याची तुमची हिंमत कशी झाली?”
पेपरफुटी, भरतीप्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि उध्वस्त होणाऱ्या भविष्याविरोधात जंतर-मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या देशातील तरुणांना ‘अराजकवादी’ आणि ‘फेसलेस’ ठरवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दांत निषेध करते!
तसेच सदाभाऊ खोत यांनी… pic.twitter.com/QcfKk1A7e1 — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 21, 2026
मुख्यमंत्री महोदय, तुमचे हे दावे आणि आमचे सडेतोड सवाल:
“आंदोलनाआडून राजकीय पोळी भाजली जातेय?” — “५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे आयुष्य पेपरफुटीमुळे उध्वस्त झाले, तेव्हा कुठे गेला होता तुमचा हा राजकीय ताळेबंद? स्वतःचे अपयश लपवण्यासाठी प्रत्येक आंदोलनाला ‘राजकीय’ ठरवणे हा महायुतीचा सवयीचा धंदा झाला आहे!”
“आंदोलनात अराजकता पसरवणारे घुसलेत?” — “ज्या तरुणांनी दिवस-रात्र अभ्यास करून परीक्षा दिल्या, ते आज रस्त्यावर न्यायासाठी भीक मागत आहेत. त्यांना ‘अराजकवादी’ ठरवून त्यांच्या पाठीवर पोलिसांच्या लाठ्या चालवणे, हा तुमचा कसला न्याय?”
“पोलिसांचे नियंत्रण नसते तर भयंकर घडले असते?” — “अहो, लाठीमार आणि अश्रुधूर सोडून तुम्ही विद्यार्थ्यांचे आवाज दाबू शकत नाही! नियंत्रण पोलिसांचे नाही, तर तुमच्या भ्रष्ट व्यवस्थेवरील सुटले आहे!”
“जालियनवाला बागची आठवण झाली”; विद्यार्थी लाठीचार्जनंतर संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे धरणे आंदोलन
“ज्या तरुणांच्या जिवावर तुम्ही सत्तेच्या खुर्च्यांवर बसला आहात, त्यांनाच ‘दहशतवादी’ आणि ‘अराजकवादी’ ठरवून तुम्ही स्वतःच्या विनाशाची नांदी लिहीत आहात.”
“तरुणांच्या संतापाची ही आग कोणत्याही लाठीमाराने किंवा दबावाने विझणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांनी देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांची तात्काळ माफी मागितली पाहिजे!”