
PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप
चिंचवड येथील सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प या ४.५१९ किलोमीटरच्या मार्गासाठी ९१० कोटी १८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १५ मार्च २०२४ रोजी रेल विकास निगम लिमिटेडला (RVNL) या कामाचे आदेश देण्यात आले. सद्यस्थिती पाहता:
आकुर्डीतील खंडोबा माळ ते बजाज ऑटो दरम्यान सेगमेंट जोडणी पूर्ण झाली आहे.
निगडीतील अण्णा भाऊ साठे बस टर्मिनस येथे स्टेशनचे काम सुरू आहे.
भक्ती-शक्ती, टिळक चौक आणि चिंचवड स्टेशन या चारही प्रस्तावित स्थानकांच्या जिन्यांचे काम सुरू झाले असले तरी त्याची गती कमी आहे. (Pimpri-Chinchwad News)
मेट्रोच्या खांबांसाठी महामार्गाच्या मध्यभागी मोठे खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून, निगडी ते पिंपरी दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
अपघातप्रवण क्षेत्र: बॅरिकेड्स आणि राडारोड्यामुळे मार्ग अरुंद झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वेळ वाचवण्यासाठी अनेक जण ‘रॉन्ग साईड’ने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
धुळीचे साम्राज्य: खोदकामामुळे परिसरात धुळीचे लोट उसळत आहेत. याचा थेट परिणाम वाहनचालकांच्या दृश्यमानतेवर आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. श्वसनाचे विकार वाढत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.
महामेट्रो प्रशासनाने हे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काम सुरू होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप एकाही स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. जर कामाचा वेग वाढला नाही, तर ही मुदत उलटून जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर काम वेळेत पूर्ण झाले, तर २०२८ पासून निगडी, प्राधिकरण आणि आकुर्डी परिसरातील प्रवाशांना थेट स्वारगेटपर्यंत विनाअडथळा प्रवास करता येईल.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी भक्ती-शक्ती (निगडी) ते मदर टेरेसा पूल या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे निगडी आणि पिंपरी परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
मेट्रोचे काम युद्धपातळीवर करून रस्ते मोकळे करावेत.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या चौकांत अतिरिक्त पोलीस तैनात करावेत.
धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमितपणे पाणी फवारणी करावी.
विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
मेट्रोचे काम शहराच्या भविष्यासाठी आवश्यक आहे, यात शंका नाही. मात्र, काम सुरू असताना पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि धूळ नियंत्रणासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. सध्या प्रवाशांचा दोन किलोमीटरच्या अंतरासाठी अर्धा तास जात आहे. — श्वेता शिंदे, चिंचवड
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या खोदकामामुळे परिसरात धुळीचे प्रचंड लोट उसळतात. याचा त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. रस्ते अरुंद झाल्याने अपघातांची भीतीही वाढली आहे. महामेट्रोने धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज पाणी फवारणी करायला हवी. — राहुल शेळके, चिंचवड
मेट्रोचे काम आवश्यक आहेच, पण त्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आता असह्य होत आहे. आकुर्डी आणि चिंचवड स्टेशन परिसरात सकाळी आणि संध्याकाळी तासन्तास अडकून राहावे लागते. — सुनीता देशपांडे, नोकरदार महिला.