
मुंबईच्या स्वच्छतेसाठी 'वॉर्ड' स्तरावर ॲक्शन प्लान! राडारोडा पसरवणाऱ्यांवर महानगरपालिकेची नजर, आराखडा तयार करण्याचे आदेश
मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी केवळ नियमित साफसफाईवर अवलंबून न राहता, आता बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे (सी अँड डी वेस्ट) संकलन शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. यासाठी प्रत्येक विभाग स्तरावर (वॉर्ड लेव्हल) स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी गुरुवारी दिले.’स्वच्छ सर्वेक्षण-२०२६’ आणि ‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील स्वच्छता कामांचा आढावा घेण्यासाठी ‘एम पश्चिम’ आणि ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.(फोटो सौजन्य – AI)
राज्यातील 364 पोलिसांना मिळणार बढती; सहाय्यक पोलिस निरीक्षक आता होणार पोलिस निरीक्षक
होते. यावेळी डॉ. जोशी यांनी मुंबईच्या स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत कामात अधिक पारदर्शकता आणि वेग आणण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला उपायुक्त भाग्यश्री कापसे, विश्वास मोटे, किरण दिघावकर, संतोषकुमार धोंडे, संध्या नांदेडकर, मनीष वळंजू यांच्यासह विविध विभागांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. उपनगरातील कचरा संकलनाचा अनुशेष आणि विशेष काळजीयोग्य कचरा यावरही यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे चर्चा करण्यात आली.
शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे राडारोडा टाकला जातो, ज्यामुळे स्वच्छतेच्या मानांकनावर परिणाम होतो. हा राडारोडा रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या परिसरातील अनधिकृत ठिकाणे शोधून काढावीत. तिथे किती प्रमाणात राडारोडा टाकला जातो आणि त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, याची इत्थंभूत माहिती आराखड्यात समाविष्ट करणे आता बंधनकारक असणार आहे.स्वच्छतेच्या कामात मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी डॉ. जोशी यांनी कठोर पवित्रा घेतला आहे. जे स्वच्छता कर्मचारी दीर्घकाळापासून रजेवर आहेत किया कामावर विनाकारण अनुपस्थित राहत आहेत, त्यांच्यावर तत्काळ प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
सकाळचे सत्र या सत्रात पालिकेच्या अधिकृत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून मुख्य रस्ते आणि परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे.दुपारचे सत्र नंतरच्या टप्प्यात रस्ते स्वच्छता योजना किंवा ‘पिक आर्मी ‘व्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येणार आहे.पर्यवेक्षण: केवळ कामगार नेमून चालणार नाही, तर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटी देऊन स्वच्छतेची खातरजमा करण्याचे निर्देश दिले. स्वच्छता केवळ कागदावर न राहता ती दृश्य स्वरूपात प्रतिबिंबित व्हायला हवी. यांत्रिकी पद्धतीने केली जाणारी स्वच्छता अधिक प्रभावी करा.