
वन्यप्राण्यांच्या दहशतीने शेती संकटात! पिकांचे नुकसान मोठे, भरपाई मात्र अपुरी; शेतकरी हवालदिल
राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची वाढती संख्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. एक दशकापूर्वी जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा वावर तुलनेने कमी असल्याने जंगलालगतच्या भागात शेतकरी निर्धास्तपणे शेती करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत वाघ, हत्ती आणि इतर वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय वाढल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच पिकांचे नुकसान झाल्यानंतर मिळणारी नुकसानभरपाई अपुरी ठरत असल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य यांना जोडणारे महत्त्वाचे वन्यजीव कॉरिडॉर गडचिरोली वनवृत्तातील वडसा वनविभागातून जातात. या वनविभागात गडचिरोली, आरमोरी, धानोरा, देसाईगंज, कुरखेडा आणि कोरची तालुक्याचा समावेश असून, या भागात वाघ आणि हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी वाघांच्या भीतीमुळे शेतकरी समूहाने शेतीची कामे करत होते.(फोटो सौजन्य – AI)
मात्र, सध्या हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतशिवारात जाऊन पिकांचे संरक्षण करणेही कठीण झाले आहे. पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. वडसा वनविभागात गेल्या एका वर्षात पिकांच्या नुकसानीपोटी सुमारे ६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली आहे. यावरून या भागातील नुकसानीची तीव्रता लक्षात येते. खरीपसोबतच रब्बी हंगामातही वन्यप्राण्यांचा उपद्रव कायम असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. वनविभागाच्या पथकांकडून हत्ती व वाघांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. गत आठवड्यात गडचिरोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये हत्तींनी रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. मात्र, प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत मिळणारी नुकसानभरपाई अत्यल्प असल्याने आगामी खरीप हंगामात शेती करावी की नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.
या मार्गावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाने आपल्या कॅमे-यात हा क्षण कैद केला असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाघाचे हे शांत आणि डौलदार चालणे अनेकांना भुरळ घालत असले तरी, या परिसरातून प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक धोक्याची सूचनाही मानली जात आहे.
दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाले आहे. जंगल परिसराला लागून असलेली शेती कसायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ही स्थिती पुढेही कायम राहिल्यास उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी शेती केली नाही तर उदरनिर्वाह करायचा कसा ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
भंडारा. जिल्ह्यातील प्रसिद्ध नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात वाघाचा मुक्तसंचार पाहायला मिळाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिटेझरी ते साकोली या मुख्य मार्गावर वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे. पिटेझरी ते साकोली या मुख्य मार्गावरून प्रवास करत असताना काही वाहनचालकांना हा थरारक अनुभव आला. मध्यरात्री वाघाने रस्त्यावर मुक्तसंचार केला. विशेष म्हणजे, समोरून वाहन येत असल्याचे पाहूनही न डगमगता हा वाघ अतिशय शांतपणे रस्त्यावरून चालताना दिसून आला.