
शेवगाव आणि पाथर्डीला गारपीटीने झोडपले; शेतकरी मोठ्या संकटात
या गारपीटीत गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात सर्वत्र गहू आडवा पडल्याचे चित्र दिसत आहे. या शिवाय संत्राच्या फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. यातील काही ठिकाणी बुधवारी सायंकाळी, काही ठिकाणी गुरूवारी पहाटे तर काही ठिकाणी गुरूवारी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी दोन नंतर हा पाऊस झाला. आकाशात काळे ढग साचल्यानंतर काही वेळाने जोराचा वारा सुरू झाला. त्यानंतर जोराचा पाऊस सुरू झाला. यात काही ठिकाणी गारा पडल्याने गारांचा खच साचलेला दिसला.
मुंबईकरांनो लक्ष द्या! आता तुमच्या नवीन दुचाकींसाठी ‘या’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात
ढोरजळगाव गहू, कांदा, हरभरा, ज्वारी, उन्हाळी बाजरी, मूग आणि फळबागाचे गारपीटीने नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हाता तोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांनंतर यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटी अवकाळीने थैमान घातले. काढणीस तयार झालेल्या कांद्याच्या गाभ्यामध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे कांदा सडण्याची भिती निर्माण झाली आहे.
माळेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली बाजरी, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली पिके आडवी झाली आहेत. त्याचबरोबर मिरचीच्या पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
फेब्रुवारी 2026 मध्ये ‘या’ Bikes चा वेगळाच दरारा! ग्राहकांचा मिळाला उदंड प्रतिसाद
दुपारी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस, गारपीट झाल्यानंतर थंडगार वारे वाहू लागले. सायंकाळनंतर नगर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वाऱ्यांचा जोर वाढला होता. आकाशात ढग साचल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी विजा चमकत असल्याने शेतात काढून ठेवलेला माल उचलण्यासाठी घाई झाली.