
कर्मचारी अपुरे; तरी स्वच्छ पाण्यासाठी प्रयत्न सुरू
88 नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडे
ग्रामपंचायत काळातील अपुरा कर्मचारी वर्ग आहे. तरीही नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
ज्ञानेश्वर मिसाळ, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जामखेड
पाण्याच्या टाकीची झाली मोठी दुरवस्था
– यावेळी बोलताना शहाजी राळेभात म्हणाले की, “शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची व इतर ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली असता टाकीची स्वच्छता अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून आले. पाण्यात शेवाळ आढळल्यामुळे हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
टाकीची पाहणी करताना मान्यवरांची मोठी उपस्थिती
या पाहणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद कोठारी, युवा नेते शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, माजिद कुरेशी, वसीम सय्यद, इस्माईलभाई सय्यद, संदिप गायकवाड, डॉ. कैलास हजारे, सागर सदाफुले, प्रवीण उगले, हरिभाऊ आजचे, सागर भोसले, सचिन शिंदे, दिपक घायतडक, दत्ता डिसले, स्वामी दिक्षित यांच्यासह नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर मिसाळ उपस्थित होते.
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनीही नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करताना सांगितले की, -पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी आवश्यक रजिस्टर व नौदीही दिसून आल्या नाहीत. शहरातील जवळपास नव्वद टक्के नागरिक हेच पाणी पितात. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नगरपरिषदेला स्वच्छ पाणी देता येत नसेल तर मुख्याधिका-यांनी बदली करून घ्यावी. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.