Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‌‌अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीसोबत जावे ; मिटकरींचे खळबळजनक वक्तव्य

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत काही आलबेल नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 22, 2024 | 04:02 PM
सौजन्य-सोशल मीडिया

सौजन्य-सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत काही आलबेल नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टीका केल्यानंतर महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकटे पाडले जात असल्याचा आरोप काही नेत्यांकडून होत आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अकोल्यात माध्यमांशी बोलताना मिटकरींनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ”अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि वचिंतसोबत जावे, असे विधान मिटकरींन केले आहे. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मिटकरींच्या या विधानामागे अनेक कयास लावले जात आहेत.

वचिंत बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वत: ची कारकिर्द सुरू केली. लोकसभा निवडणुकांवेळी महाविकास आघाडीने त्यांचा छळ केला. पण हे आपले वैयक्तिक मत असून पक्षाने यावर विचार करावा, असेही मिटकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच. काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते राज्याचे राजकारण पालटून टाकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी, अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे, यासाठी दोन्ही मित्रपक्ष काम करत आहेत. असा धक्कादायक आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला चारपैकी फक्त एकच जागा जिंकता आली. तर वंचित बहुजन आघाडीच्या एकही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचाही अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यात महाराष्ट्रात भाजपालाही नऊ जागांवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रात झालेल्या या नाचक्कीनंतर महायुतीत अजित पवार यांच्या गटाला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे.

दोन-तीन दिवसांपुर्वीच शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी ‘अजित पवार महायुतीत थोडे उशिराने आले असते तर बरे झाले असते,’ असे विधान केले होते. कदम यांच्या या विधानावर, ‘अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावे लागले असते. असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला होता.

Web Title: Ajit pawar should go with vanchit bahujan aghadi sensational statement of mitkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2024 | 04:02 PM

Topics:  

  • ajit pawar
  • amol mitkari
  • BJP
  • Nationalist Congress Party
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.