
रोहित पवार म्हणाले की, “अपघाताच्या वेळी विमान उजवीकडे झुकले होते, तर अपघाताच्या व्हिडिओमध्ये विमान डावीकडे झुकलेले दिसते. अहवालात असे म्हटले आहे की, विमान झाडांना धडकले, परंतु घटनास्थळी कोणतेही झाडे नाहीत तर फक्त लहान गवत होते.”
रोहित पवार म्हणाले, “AAIBचा तपास भविष्यात असे अपघात रोखण्यासाठी आहे. अपघातासाठी कोण जबाबदार आहे, याची चौकशी झालीच पाहिजे. नियमांनुसार, योग्य दृश्यमानतेशिवाय विमान उडू शकत नाही. तर, बारामतीमध्ये दृश्यमानता कमी असताना, विमानाला मुंबईहून बारामतीला उड्डाण करण्याची परवानगी का देण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वायएसआर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर, खराब हवामानाच्या बाबतीत सुरक्षित ठिकाणी उतरणे आवश्यक असलेले कठोर नियम लागू करण्यात आले. तर, या विमानाने बारामतीमध्ये उतरण्याचा प्रयत्न का केला?”असंही त्यांनी विचारलं.
“अजित पवार यांना जाणूनबुजून जुने विमान देण्यात आले. विमानतळावर पायलटची बीए (श्वास विश्लेषक) चाचणी अनिवार्य आहे, परंतु या पायलटची बीए चाचणी विमानात घेण्यात आली होती का, त्या दिवशी इतका दूरचा प्रवास करायचा नसतानाही विमानात ९०% इंधन का भरण्यात आले? ब्लॅक बॉक्स चांगल्या स्थितीत आहे… मग डेटा कसा खराब झाला? फ्लाइट रडार वेबसाइटवरून या विमानाची जुनी माहिती का हटवण्यात आली?” याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
Devendra Fadnavis : स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्र शासनाकडे निवेदन-
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “१६-२० जानेवारी २०२३ रोजी, एकनाथ शिंदे दावोसला जात होते, त्यावेळी इंधन भरण्यासाठी बहरीनमध्ये थांबले. इंधन भरल्यानंतर, त्यांचे व्हीएसआर विमान आधी इराणच्या हवाई हद्दीत दाखल झाले, तिथे त्यांना विमान थांबवण्यात मनाई करण्यात आली. त्यानंतर विमान इराकच्या हवाई हद्दीत गेले, पण तिथेही त्यांना विमान उतरवण्यास नकार देण्यात आला, त्यामुळे विमान पुन्हा बहरीनला नेण्यात आले. तिथे सर्व परवनग्या घेऊन त्या विमानाचे उड्डाण करण्यात आले. मग, जे अजित पवार यांच्यासोबत झाले, ते एकनाथ शिंदेसोबतही होणार होते का, असा आमचा प्रश्न आहे. VSR कंपनीचा मालक आमच्या कर्मचाऱ्याला म्हणतो, माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. VSR च्या मालकामध्ये असे बोलण्याची हिंमत कुठून आणि कुणामुळे आली, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
“दादांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही राहुल गांधींना भेटू. आम्ही त्यांना लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यास सांगू. असंही रोहित पवारांनी सांगितलं. रोहित पवार म्हणाले, “घटनेपूर्वी दादा सुमारे पाच महिने अत्यंत खबरदारी घेत होते. त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे बंद केले होते; ते फक्त काचेच्या ग्लासमधून पाणी पित होते. पाणी दूषित करण्याचा प्रयत्न असू शकतो. अजित दादांना आम्ही विचारलं, ते असं का करत आहेत, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की, त्यांना सावध राहण्याच्या आणि खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ते सरकारी सुरक्षा रक्षकांसोबतच खाजगी सुरक्षा रक्षकही सोबत ठेवत होते.असा दावाही रोहित पवार यांनी केला.