Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनियमित पावसाने बिघडले शेतीचे गणित; खरिपाची पेरणी लांबली, कपाशी, सोयाबीनवर…

अकोला जिल्ह्यात मान्सून उशिरा सक्रिय झाल्यामुळे आणि पावसात खंड पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार मूग व उडिदाची पेरणी करण्याची योग्य वेळ निघून गेली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 04, 2026 | 01:28 PM
अनियमित पावसाने शेतीचे बिघडले गणित; खरिपाची पेरणी लांबली; कपाशी, सोयाबीनवर किडींचे आक्रमण

अनियमित पावसाने शेतीचे बिघडले गणित; खरिपाची पेरणी लांबली; कपाशी, सोयाबीनवर किडींचे आक्रमण

Follow Us
Follow Us:

अकोला : सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने पेरण्यांनाही विलंब झाला. अकोला जिल्ह्यात काही भागात अद्यापही पेरणीची कामे सुरू होती, तर सुरुवातीला पेरणी झालेल्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. काही भागात रोगराईनेही डोके वर काढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

यंदाच्या मान्सूनने सुरुवातीपासूनच जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने खरीप हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले होते. जूनपासून ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची मोठी तूट नोंदविण्यात आली. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता काहीशी कमी झाली आहे. कमी पावसाचा थेट परिणाम कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह इतर खरीप पिकांवर झाला आहे. मध्यंतरी पावसाचा दीर्घ खंड, ढगाळ वातावरण आणि जमिनीत ओलाव्याचा अभाव यामुळे अनेक भागातील पिकांची वाढ खुंटली होती. काही ठिकाणी पिके सुकण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले.

कोकणची ‘जीवनवाहिनी’ बनली ‘मरणवाहिनी’ ! हजारो कोटींचा Mumbai -Goa महामार्ग आहे की अपघातांचा सापळा?

सध्या झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असला, तरी पुन्हा पावसात खंड पडल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः अकोला, बार्शिटाकळी, बाळापूर, पातूर आणि मूर्तिजापूर तालुक्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

अकोला जिल्ह्यात मान्सून उशिरा सक्रिय झाल्यामुळे आणि पावसात खंड पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार मूग व उडिदाची पेरणी करण्याची योग्य वेळ निघून गेली असून, आता उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात मोठी घट किंवा पीक हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पिकांची खबरदारी घ्यावी.

– डॉ. तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी अकोला.

यंदा पावसाने सातत्याने शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. जिल्ह्यात पावसाच्या मोठ्या तुटीने यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशात शेती कामांसाठी मजूर देखील मिळणे कठीण झाले आहे.

– हरिभाऊ कोगदे, शेतकरी

हवामान विभागाने आगामी काळात काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली. हवामान विभागाने आगामी काळात काही भागात मध्यम पावसाची आवश्यकता आहे.

– गजानन खराटे, शेतकरी, चांदूर

 

Web Title: Erratic rainfall disrupts agricultural economics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • akola news

संबंधित बातम्या

बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; 15 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष
1

बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; 15 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष

शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा
2

शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा

प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम, ग्रामपंचायत निधीच्या अपहारावरून एल्गार; पातूर पं.स. समोर ‘भीक मांगो’ आंदोलन
3

प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम, ग्रामपंचायत निधीच्या अपहारावरून एल्गार; पातूर पं.स. समोर ‘भीक मांगो’ आंदोलन

Akola News : रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु; नागरिक संतप्त
4

Akola News : रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु; नागरिक संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.