Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

शेतीपिकांच्या नुकसानीपोटी तेल्हारा तालुक्यातील २४० शेतकऱ्यांच्या १६० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांसाठी १३ लाख ६ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 30, 2026 | 08:48 PM
अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

Follow Us
Follow Us:

अकोला : यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ६५ गावांमधील १ हजार ८४३ शेतकऱ्यांच्या १ हजार ३८.१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानंतर जिल्हा प्रशासनाने ७ ऑगस्ट रोजी २ कोटी ११ लाख १७ हजार रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, कापूस, सोयाबीन, तूर या शेतीपिकांसह संत्री, केळी आणि पपई या फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतीपिकांच्या नुकसानीपोटी तेल्हारा तालुक्यातील २४० शेतकऱ्यांच्या १६० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांसाठी १३ लाख ६ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. फळपिकांच्या नुकसानीमध्ये अकोट तालुक्यातील २५ गावांतील ३५९ शेतकऱ्यांच्या संत्रा आणि केळी पिकांचे नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील २२ गावांतील १ हजार १४६ शेतकऱ्यांच्या ५०७.८५ हेक्टर केळी आणि ५४.५ हेक्टर पपई पिकांचे नुकसान झाले.

याशिवाय, बाळापूर तालुक्यातील २ गावांतील सात शेतकऱ्यांचे ४.७५ हेक्टर, पातूर तालुक्यातील सात गावांतील ८८ शेतकऱ्यांचे ५१.३३ हेक्टर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावातील तीन शेतकऱ्यांचे १.२ हेक्टर केळी पिकाचे नुकसान झाले आहे. या सर्व फळपिकांच्या नुकसानीपोटी १ कोटी ९७ लाख ५७ हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे.
ओटीपीद्वारे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक

मंजूर मदत मिळण्यासाठी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) किंवा आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या ओटीपीद्वारे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर मदतीची रक्कम डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

मदत निधीतून कर्जवसुली करता येणार नाही

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा मदतीचा निधी बँकांनी कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी वसुलीसाठी वळता करू नये, असे शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्यातून कर्जवसुली करू नये, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित बँकांना तातडीने आवश्यक सूचना द्याव्यात, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Farmers Crisis : पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

Web Title: Government issues clear orders to banks do not recover loans from relief funds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • akola news
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त
1

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार
2

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी
3

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी

Nepal Flood: नेपाळ-चीन पर्यटनाला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मोठी बातमी; ४५ जणांचा ग्रुप…
4

Nepal Flood: नेपाळ-चीन पर्यटनाला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मोठी बातमी; ४५ जणांचा ग्रुप…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.