Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोटारपंपाचे वीज कनेक्शन बंद, डिमांड भरूनही वीजपुरवठा नाही; महावितरणचा शेतकऱ्यांना झटका

नवीन वीज कनेक्शनऐवजी शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवर मोटरपंप चालवावा, असा पर्याय दिला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 18, 2026 | 12:23 PM
मोटारपंपाचे वीज कनेक्शन बंद, डिमांड भरूनही वीजपुरवठा नाही; महावितरणचा शेतकऱ्यांना झटका

मोटारपंपाचे वीज कनेक्शन बंद, डिमांड भरूनही वीजपुरवठा नाही; महावितरणचा शेतकऱ्यांना झटका

Follow Us
Follow Us:

अकोला : शेतातील विहिरींवर मोटरपंपासाठी वीज कनेक्शन मिळावे म्हणून महावितरणकडे डिमांड भरले. मात्र, दोन-तीन वर्षे उलटूनही वीजपुरवठा न झाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यातच डिमांडची रक्कम परत करण्याची पत्रे पाठवून नवीन वीज कनेक्शनऐवजी सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारण्यास सांगितले जात असल्याचा आरोप किसान सभेने केला.

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने तसेच विविध शासकीय योजनांतून शेतात विहिरी खोदल्या आहेत. सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन दुबार पिके घेता यावीत, उत्पादन व उत्पन्न वाढावे, हा त्यामागील उद्देश होता. अनेक शेतकऱ्यांनी विहिरींसाठी कर्जही घेतले आहे. मात्र, मोटरपंपासाठी वीज कनेक्शन मिळावे म्हणून महावितरणकडे डिमांड भरल्यानंतरही त्यांना वीजपुरवठा मिळालेला नाही. महावितरणकडून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना रक्कम परत घेण्याची पत्रे पाठविण्यात आली असून, रक्कम न घेणाऱ्यांना रजिस्टर्ड पोस्टाने चेकद्वारे परत केले जात असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

नवीन वीज कनेक्शनऐवजी शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवर मोटरपंप चालवावा, असा पर्याय दिला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, मुख्य सचिवांसह संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारवजा निवेदन दिले आहे. महिनाभरानंतरही कार्यवाही न शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी केल्या, डिमांड भरली; मग दोन-तीन वर्षे वीज कनेक्शन न देता आता पैसे परत करून सोलर लावण्यास सांगणे हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे.

…अन्यथा अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

वीज कनेक्शन घ्यायचे की सोलर, हा निर्णय शेतकऱ्यांचा असला पाहिजे. महावितरणने डिमांड भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने वीजपुरवठा करावा. अन्यथा अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. नापिकी, अतिवृष्टी, बोगस बियाणे, शेतमालाला हमीभावाचा अभाव आणि वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. अशा परिस्थितीत सिंचनासाठी आवश्यक वीजपुरवठा न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत असल्याची टीका किसान सभेने केली आहे.

कमिशनसाठी कनेक्शन बंद?

किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिनगारे, कार्याध्यक्ष अविनाश जरीले, गणपत मेंढे, अनिल चव्हाण, जिल्हा सचिव जगन चांभारे, पांडुरंग राऊत, सूरज बुरबुरे व पंकज पिसुडे यांनी सोलर कंपन्यांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कमिशन दिले जात असल्याचा आरोप केला.

‘सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये वादळामुळे…’; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सूचना

Web Title: Motor pumps electricity connection disconnected power supply not restored despite payment of demand charges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • akola news
  • Farmers Issue

संबंधित बातम्या

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ताण होणार कमी; अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षकेत्तर पदांची भरती
1

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ताण होणार कमी; अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षकेत्तर पदांची भरती

अकोल्यातील नागरिकांवर मोठं जलसंकट; काटेपूर्णात 5 वर्षांच्या तुलनेत निम्म्याहून कमी साठा
2

अकोल्यातील नागरिकांवर मोठं जलसंकट; काटेपूर्णात 5 वर्षांच्या तुलनेत निम्म्याहून कमी साठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.