
सिंधुदुर्गमध्ये बागायतदार शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
बँकेच्या कर्जवसुलीस येणाऱ्या गाड्या जाळण्याचा इशारा
पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे : नाईक
सिंधुदुर्गनगरी: विदर्भ मराठवाड्याला नुकसान भरपाई देणारे सरकार कोकणावर अन्याय का करते. केंद्र राज्य सरकारने येत्या २३ मार्चपर्यंत आंबा, काजू पिकाची नुकसान भरपाई देण्याबाबत शासन निर्णय न घेतल्यास येत्या २३ मार्च रोजी मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन छेडले जाईल. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चक्क इशारा दिला आहे.
सिधुदुर्गनगरी येथे आंबा काजू उत्पादक शेतकऱ्याचा मोर्चा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गावडे, जयप्रकाश चमणकर, सुशांत नाईक, अमरसेन सावंत, गणेश गावकर, बाबुरावधुरी जयेद्र परुळेकर सतिश सावंत, राजन तेली, राजन नाईक, धिरज परब, अजिंक्य गावडे, राजन गजनवार, विश्वा सकोरे, गिरीश बोर्डे यांच्यासह जिल्ह्यातील तीन हजारो हून अधिक शेतकरी मोर्चात सहभागी झाले.
कोकणचा ‘राजा’ भीषण संकटात! ढगाळ वातावरण, धुके अन्…; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
बँकेच्या कर्जवसुलीस येणाऱ्या गाड्या जाळू
ओरोस येथील छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहान घालून मोर्चाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाच्च सभेत रुपांतर झाले. शेट्टी म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर अडचणीत आला आहे, त्याल अडचणीतून बाहेर काढणे मायबा सरकारची जबाबदारी आहे. कोकणात आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीच राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाकडे मागण केली आहे.
मार्च महिन्यात बँकाच्या वसुल्या सुरु आहेत. वेळ पडल्यास शेती कर्जाची वसुली करणाऱ्या गाडया जाळू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांवर या आधी असे संकट कधी आलं नव्हतं. जिल्हा बँकेने जे व्याजदर सवलत जाहीर केली आहे, परंतु आता शेतकऱ्याकडे मुद्दलच भरण्यासाठी पैसे नाहीत. हा मोर्चा व्यक्ती विरोधात नाही तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. यामध्ये पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे.
Kokan News: कोकणच्या ‘राजा’वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणार : मंत्री राणे
बागायतदार शेतकरी रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही. सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. माझ्या सूचनेनंतर ९० टक्के नुकसान झाल्याचा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतली आहे. शब्दापलीकडे कृती करून सरकार आंबा व काजू बागायतदारांना न्याय देईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी बागायतदारांच्या मोर्चा सामोरे जात दिला