
देसाई यांच्यावरील टीकेचं कारण वेगळं
कोयना धरणातून पाणी सोडण्या संंदर्भात टीका करताना शंभूराज देसाई यांच्यावर टीका करण्याचे कारण वेगळं आहे. पाटण तालुक्यात विट्याच्या शितोळे समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थानाचा प्रश्न सोडविला आहे. परिणामी, शितोळे समाज आमच्याकडे वळला आहे. ते त्यांना कुठंतरी खुपत आहे. हे देसाई यांच्यावर टीका करण्याचे कारण आहे. तुमच्या कुंटुबियांची पन्नास वर्षांहून विटा शहरात सत्ता आहे. तुम्ही साधे शहराला पिण्याच्या पाणी पुरेसे देऊ शकला नाही, अशी टीका बाबर यांनी केली.
पाणी साेडण्यासाठी केला पाठपुरावा
कृष्णा नदी कोरडी पडली असताना आणि जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असताना जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी यांनी आमदार अनिल बाबर यांच्याकडे कृष्णा नदीत कोयना धरणाचे पाणी सोडण्यासाठी चर्चा करुन मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार आमदार बाबर यांंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा केला. कृष्णा नदीत पाणी सोडले गेले. तोपर्यंत कुणाची तक्रार नव्हती. त्यानंतर अनेक पत्रकार परिषदा सुरु झाल्या, असे बाबत म्हणाले.