
पाणवठ्यासाठी वनविभागाचा वेट अॅण्ड वॉच! सौर उर्जेवर आधारित कृत्रिम जलस्त्रोत, टँकरचा केला जाणार उपयोग
यवतमाळ जिल्ह्याला प्रचंड जंगलव्याप्त भाग लागलेला आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे पशुपक्षी, वन्यप्राणी राहतात. दरवर्षी मार्च महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने वन्यप्राण्यांची नागरी वस्त्यांकडे धूम असते. दरम्यान यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे तुर्तास तरी जंगलातील पानवठ्याला अजून थोडा अवधी आहे. मात्र वाढते तापमान लक्षात घेता वनविभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून सौर उर्जेवर आधारित कृत्रिम जलस्त्रोत उभारण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – istock)
वर्षभरात पीक नुकसानीच्या ३ हजार घटना! वन्यप्राणी हल्ले; अनुदान वितरणात वडसा वनविभाग अव्वल
यवतमाळ जिल्हा घनदाट वनसंपदेने वेढलेले आहेत. यामध्ये टिपेश्वर अभयारण्य व पैनगंगा अभयारण्य येथे अनेक पशु पक्ष्यांसह इतर प्राणी पहायला मिळातात. तर काही जंगलाचा भाग हा यवतमाळसह पुसद, पांढरकवडा वनविभागाचे वन परिसर आणि वाशिम जिल्ह्यातील जंगल परिसराचा काही भाग यवतमाळ वनविभागाच्या अंतर्गत येतो. दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करून जवळपास ३ हजार ४७० चौरस किलोमीटर हेक्टर वनक्षेत्र आहे. ज्यामध्ये यवतमाळ वनक्षेत्राचा समावेश २१०७चौरस किलोमीटरमध्ये आहे. या घनदाट जंगला वाघ, अस्वल, रानडुक्कर, बिबट अशा हिंस्त्र वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी परवड होऊ नये म्हणून अधिवासातच तहान भागविण्यात यावी. यासाठी कृत्रिम पानवठे प्राण्याकरिता महत्त्वाचे असतात. जिथे नैसर्गिक जलसोत्र नसतात किंवा असले तरी कोरडे पडण्याची शक्यता असते तिथे उपयोजना करावी लागते. दरवर्षी कृत्रिम पानवठे तयार करून त्यात टँकरने पाणी सोडण्यात येते. मार्च महिन्यात तापमानाचा पारा वाढल्याने जंगलातील जलखोत आटत्तात. अशावेळी जंगलातील हिंस्त्र प्राणी, पशु पक्षी मानव वस्तीकडे व लगतच्या शेतात पाण्यासाठी धाव घेतात आणि मानव पशु संघषर् वाढतो. अशा घटनात अनेक शेतकरी जखमी झाले आहे, तसेच शेतपिकांचेही नुकसान होते. अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाकडून दरवर्षी जंगलातच पाणवठे तयार केले जातात. यावर्षी कृत्रिम जलस्रोत उभारणीसाठी शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जंगलात प्राण्यांसाठी टँकरच्या माध्यमातून जलकुंड भरून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. परंतु सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. अशातच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वनविभागाने प्राण्याची ताण-भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करून पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकती होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी वन्यप्रेमी नागरिकांतून करण्यात येत आहे.
कापूस विक्रीचा पेच आता आणखी वाढला! विक्रीसाठी मुदतवाढ; मात्र नवीन नोंदणीचा मार्ग करण्यात आला बंद
उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने वनक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कृत्रिम जलस्रोत उभारणीसाठी शासनाकडे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या वनक्षेत्रांमध्ये सौरऊर्जेवर आधारित जलस्रोत उभारण्यात येत असून टैंकरच्या माध्यमातून जलकुंड भरून ठेवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. – किशोर मानकर, विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी, असे मत व्यक्त केले आहे.