Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माफीनामा ते माफीनामा! निवडणूक तोंडावर आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची माफी

जगातील सर्वात मोठा पक्ष, केंद्रात सलग दहा वर्षे सत्ता, देशातील विविध राज्यात भरभक्कम बहुमत असे सर्व असले तरी अजूनही भाजपमध्ये संघटनेला तेवढेच महत्त्व आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 23, 2024 | 11:50 AM
माफीनामा ते माफीनामा! निवडणूक तोंडावर आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची माफी
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : ‘गेल्या पाच वर्षांत माझ्याकडून पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यापैकी कोणी दुखावले असेल, तर मला माफ करा’ हे शब्द आहेत, भाजपचे खासदार आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचेच उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे. निवडणूक तोंडावर आल्यानंतर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर असे माफीनामे येणे फारसे नवीन नाही. ते फक्त भाजपमध्येच घडते, असेही नाही. चुका झाल्या याची जाणीव झाल्यानंतर माफी मागणे गैर देखील नाही. मात्र निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे या चुका पुन्हा होणार नाहीत, याची खात्री कोण देणार? नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची माफी मागून त्या चुकांवर पडदा पडणार आहे का? ज्यांनी भरभरून मते दिली, त्यांच्याबाबत चुका झाल्याच नाहीत का? मुळात माफी मागायची वेळच का यावी? याची उत्तरेही मिळणे आवश्यक आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खा. सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी मिळणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. इच्छुक वगळता इतरांच्या मनात याबाबत शंका नव्हती. इच्छुकांच्या मनात आपल्याला उमेदवारी मिळेल का, याबाबतच साशंकता होती. खा. विखे यांचा स्वभाव हा भाजपमध्ये गेल्या पाच वर्षांतील चर्चेचा विषय होता. ‘स्वभावाला औषध नसते’ असे म्हटले जात असले तरी राजकारणात आणि त्यातही निवडणुकीच्या राजकारणात सर्वच गोष्टींना औषध असते. त्यातही मोदी-शहा यांच्या भाजपमध्ये तर जालीम औषध असते. ज्यांना ज्यांना या औषधाचे चाटण चाखवाले गेले, ते त्याचा जालीमपणा अजूनही अनुभवत आहेत. हे दोन नेते सोडले तर भाजपमध्ये अद्याप तरी ‘हम करे सो कायदा’ नाही, याची जाणीव पाच वर्षात यायला हरकत नव्हती.

जगातील सर्वात मोठा पक्ष, केंद्रात सलग दहा वर्षे सत्ता, देशातील विविध राज्यात भरभक्कम बहुमत असे सर्व असले तरी अजूनही भाजपमध्ये संघटनेला तेवढेच महत्त्व आहे. ‘संघ’ ते पक्ष संघटना असा अनेकांचा प्रवास आहे. त्यामुळे त्यांना पक्षाचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील अनेक नेते परिचित आहेत. त्यांचा चुकुनही अवमान होणार नाही, याची दक्षता नेत्यांकडून घेतली जाते. त्यामुळेच कदाचित माफी मागण्या इतपत काहीतरी बिघडले असल्याची जाणीव झाली असावी. भाजप संघटनेचे निवडणुकीत किती महत्त्व असते, याचे मिळालेले डोस आणि त्याचा मागीलवेळी आलेला अनुभव हे ध्यानात घेऊनच माफीनामा आला असावा. संघटनेला वाहून घेणारे माफीनामाच्या अपेक्षेत असतील, असेही नाही. त्यांना फक्त काम करायचे असते. ‘अब की बारी, अटलबिहारी’, ‘राम मंदिर वही बनायेंगे’ ‘अब की बार, मोदी सरकार’ या मागील घोषणा असो, किंवा आताची ‘अब की बार, चारसो पार’ ही घोषणा असो. या घोषणाच त्यांच्यातील चैतन्य जागे करतात.

हे झाले संघटनेतील पदाधिकारी यांचे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय? आपल्या हक्काच्या खासदाराला फोन लावायचा म्हटले तर ते शक्य होते का? पाच वर्षांत खा. विखे यांच्याबाबत ज्या काही तक्रारी असायच्या, त्यात ते फोन घेत नाहीत, ही प्रमुख तक्रार असायची. फक्त कार्यकर्तेच नव्हे तर समाजघटकातील प्रत्येकाची ही तक्रार असायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या वेळी संसदीय पक्षाला संबोधित करत असत, त्या प्रत्येकवेळी त्यांनी लोकांशी संपर्कात रहा, असा सल्ला आवर्जून दिला आहे. पाच वर्षात तुम्ही लोकांच्या संपर्कात राहिला असाल, पण लोकांना ज्यावेळी गरज होती, त्यावेळी तुमचा संपर्क करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. ही कसरत करताना कार्यकर्ता, सर्वसामान्य मतदार रडकुंडीला यायचा. त्यांचे सांत्वन आता कसे होणार? ‘काय राव, तुमच्या खासदाराशी बोलायचे असेल तर कोणत्या नंबरवर फोन करायचा?’ असा प्रश्न भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्याला कोणी विचारला तर त्याला खाली मान घालावी लागत होती.

एखादा कार्यकर्ता काम घेऊन आल्यानंतर ‘अमुक तमुकला भेटा, काम होईल’ असे उत्तर यायचे. त्यांचे काम देखील होत होते; पण ज्यावेळी तो ‘अमुक तमुक’ कॉंग्रेसचा आहे, असे समजायचे त्यावेळी त्याला केंद्रात खरंच भाजपची सत्ता आहे का, असा प्रश्न पडायचा. कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या खासदाराची यंत्रणा स्थानिक निवडणुकीत पंजा चिन्ह घेऊन फिरणारे चालवीत असतील, तर तो भाजपचा आणि ‘संघटनेचा सर्वात मोठा अवमान होता. हा अवमानाचा घोट रिचवून हाच कार्यकर्ता आणि हीच संघटना ‘अब की बार, चारसो पार’ यासाठी झटेलही. कदाचित या माफीनाम्यापासून पुढचा माफीनामा येईपर्यंतही राबेल; पण मतदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडेही नसतील.

Web Title: Apology to apology ahead of the election and dr apology of sujay vikhe patil maharashtra government bjp maharashtra political party ahmednagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2024 | 11:50 AM

Topics:  

  • ahmednagar
  • BJP
  • Government of India
  • loksabha elections 2024
  • Maharashtra Government
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…
1

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…

BMC Election 2026: प्रचारासाठी अवघे सात दिवस, नेत्यांच्या प्रचारसभानंतर वातावरण बदलणार
2

BMC Election 2026: प्रचारासाठी अवघे सात दिवस, नेत्यांच्या प्रचारसभानंतर वातावरण बदलणार

भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार…” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप
3

भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार…” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप

BJP Alliance MIM And Congress:  MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली! विरोधक आक्रमक; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त इशारा
4

BJP Alliance MIM And Congress: MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली! विरोधक आक्रमक; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.