Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
याबाबत जिलहाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, कि राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पाळधी जळगाव नवीन बायपासच्या कामाची स्थिती, ओव्हरब्रिजचा भराव खचणे, वाहतुकीचे नियोजन, बॅरिकेडिंग, सूचना फलक, रिफ्लेक्टर, प्रकाशव्यवस्था व इतर आवश्यक सुरक्षा उपायांबाबत मी दिनांक ८ ऑगस्ट २०२६ पासून सातत्याने न्हाई तसेच जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करून संभाव्य जीवितहानीचा धोका निदर्शनास आणून दिला होता. मात्र उपाय योजना राबविण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच या दुर्घटना घडल्या.
या कालावधीत महामार्ग व बायपासशी संबंधित दुर्घटनांमध्येमंगला अर्जुन माळी मृत्यू दिनांक ५ ऑगस्ट, प्रेमराज शिवराम चौधरी मृत्यू दिनांक २० ऑगस्ट, योगेश कडू महाजन मृत्यू दिनांक २० ऑगस्ट, अनिरुद्ध सुरेश डहाके मृत्यू दिनांक २३ ऑगस्ट, शांताराम केशव पाटील, वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर ममुराबाद आसोदा बायपास सर्व्हिस रोडवरील दुर्घटनेनंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी मक्तेदारावर गुन्हा दाखल होणे ही महत्त्वाची कारवाई असली तरी या दुर्घटनांमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष न्याय मिळणेही तितकेच आवश्यक आहे. Jalgaon Highway Accidents:
Jalgaon Crime: घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार; व्हिडिओ काढल्याने …
कुटुंबातील कमावती व्यक्ती अथवा सदस्य अचानक गमावल्यामुळे संबंधित कुटुंबांवर मानसिक आधातासोबत गंभीर आर्थिक संकटही ओढवले आहे. आपण जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून वरील सर्व मृत नागरिकांच्या प्रकरणांची स्वतंत्रपणे पडताळणी करावी.
Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)
ज्या प्रकरणांमध्ये महामार्गाची स्थिती, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी अथवा संबंधित अधिकारी कंत्राटदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे तपासात निष्पन्न होईल, त्या प्रकरणांमध्ये संबंधित मृतांच्या कायदेशीर वारसांना लागू कायदे, विमा तरतुदी व शासनाच्या प्रचलित नियमानुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही अरविंद देशमुख यांनी केली आहे.






