Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रासायनिक खतटंचाईचे सावट! युद्धजन्य परिस्थितीचा फटका; संतुलित खताचा वापर करण्याचे आवाहन

युद्धजन्य परिस्थितीत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा आणि बायोडीकंपोजर मिसळून वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. या उपायामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 03:00 PM
रासायनिक खतटंचाईचे सावट! युद्धजन्य परिस्थितीचा फटका; संतुलित खताचा वापर करण्याचे आवाहन

रासायनिक खतटंचाईचे सावट! युद्धजन्य परिस्थितीचा फटका; संतुलित खताचा वापर करण्याचे आवाहन

Follow Us
Follow Us:

जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे यंदाच्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या टंचाईचे सावट असून उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संतुलित खतवापर, सेंद्रिय पर्यायांचा अवलंब आणि माती परीक्षणाच्या आधारे पीक पोषण व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढविणे शक्य असल्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. वर्धा जिल्ह्यात गतवर्षी करण्यात आलेल्या माती नमुना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील जमिनीमध्ये नत्र (नायट्रोजन) घटकाचे प्रमाण कमी, स्फुरद (फॉस्फरस) मध्यम, तर पालाश (पोटॅशियम) जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जमिनीचे आरोग्य आणि दीर्घकालीन उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.(फोटो सौजन्य – AI)

म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद! मुंबईतील सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक, मुदतवाढ देण्याची शक्यता

युद्धजन्य परिस्थितीत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा आणि बायोडीकंपोजर मिसळून वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. या उपायामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल, मातीचे आरोग्य टिकून राहील तसेच पिकांचे रोगांपासून संरक्षणही होऊ शकेल. विशेषतः नत्रयुक्त रासायनिक खतांच्या वापरात पर्यायी खतांचा वापर वाढवावा, यामध्ये सेंद्रिय खत, हिरवळीचे खत, जैवखते (बायो-फर्टिलायझर्स), तसेच नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जैविक खतांची बीजप्रक्रिया यांचा समावेश करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी आवश्यक विविध जैविक खतांची उपलब्धता जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, सेलू येथे करून देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून ‘जमीन आरोग्य पत्रिका’च्या आधारे विद्यापीठांच्या शिफारशीनुसार संतुलित खतांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले.

ST Bus News : ‘आपली बस, आपली सेवा’ १ मे पासून एसटीचे नवे अभियान..; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

८ शेतकऱ्यानी आपल्या शेतातील माती परीक्षण करून घ्यावे, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात असून अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा,- अरविंद उपरीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा, यांनी व्यक्त केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Avoid chemical fertilizers impact of warlike conditions a call to use balanced fertilizers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • farmer
  • maharashtra
  • Yavatmal

संबंधित बातम्या

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात
1

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात

Devendra Fadnavis : ड्रग्जविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उभारणार विशेष युनिट
2

Devendra Fadnavis : ड्रग्जविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उभारणार विशेष युनिट

अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
3

अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Anna Hazare : केंद्र सरकारला अण्णा हजारेंचा इशारा; RTI नियमांतील बदल मागे न घेतल्यास 5 जुलैपासून उपोषण
4

Anna Hazare : केंद्र सरकारला अण्णा हजारेंचा इशारा; RTI नियमांतील बदल मागे न घेतल्यास 5 जुलैपासून उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.