Photo Credit- Social Media संतोष देशमुखांच्या घरी आलेल्या अज्ञात महिलेने थेट बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट धरला
बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आठ आरोपींपैकी 7 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत, तर एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून ओळखला जाणारा विष्णू चाटे याला गेवराई इथल्या कोठडीत ठेवण्यात आले. मात्र, विष्णू चाटे याने न्यायालयाकडं मला लातूर कारागृहात ठेवावं, अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालयानं विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी केली आहे.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case : ‘आका’कडून ठराविक लोकांना पेमेंट असं म्हणत सुरेश धस यांनी केली ‘ही’ मागणी
एकीकडे बीड जिल्ह्यात कृष्णा आंधळे याला अटक करा, या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत. खंडणी प्रकरणात विष्णू चाटे याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला गेवराई इथल्या कारागृहात ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतर वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर आता या घटनेत मोठा खुलासा झाला आहे. खंडणी प्रकरणातील आरोप विष्णू चाटे यानं आपल्याला लातूर कारागृहात ठेवण्यात यावं, यासाठी विनंती अर्ज दाखल केला. त्यामुळे त्याला लातूर इथल्या कारागृहात हलवण्यात आले आहे. उर्वरित 6 आरोपी हे गेवराई इथल्या कोठडीतच ठेवण्यात आले.
वाल्मिक कराड याला प्रथम केज पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर बीड येथे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. वाल्मिक कराडवर प्रसार माध्यमांच्या बातम्यावरच दोषी ठरवले आहे का, असा सवाल न्यायालयाने वकिलांना विचारला. त्यावेळेस वकील अनुत्तरीत झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाल्मिक कराडला सात दिवसांचा पीसीआर दिला आहे.
5 आरोपी गेवराई कोठडीत
सोनवणे, महेश केदार, सुधीर सांगळे हे आरोपी गेवराई इथल्या कोठडीत ठेवण्यात आले आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक असलेला वाल्मिक कराड याच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं मोर्चे होताना पाहायला मिळत आहेत.
हेदेखील वाचा : ‘वाल्मिक कराडने पडद्याआड राहून धनंजय मुंडेंसाठीच माया जमवली’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप