
एसटीच्या बीड विभागात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक
बरगे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील अनेक तरुण नोकरीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांत अनेक वर्षे सेवा बजावतात. तब्बल १० ते २० वर्षे बाहेर काम केल्यानंतर त्यांची मूळ जिल्ह्यात बदली होते. मात्र, आपल्या कुटुंबासोबत उर्वरित सेवाकाळ घालवण्याची संधी मिळाल्यानंतरही त्यांना कामगिरी वाटप करताना वारंवार दुय्यम वागणूक दिली जाते.
St Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा
त्यांच्या मते, “तुम्ही बाहेरून बदली होऊन आलात, त्यामुळे ज्येष्ठता यादीत खाली आहात. ही कामगिरी मिळणार नाही, ती कामगिरी मिळणार नाही,” अशा शब्दांत संबंधित कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केला जातो. ही बाब केवळ अन्यायकारक नसून कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानालाही धक्का देणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बरगे यांनी आरोप केला की, महामंडळाच्या परिपत्रकाचा बीड विभागात चुकीचा अर्थ लावला जात आहे. धाराशिव आणि सातारा विभागात त्याच परिपत्रकाची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीने केली जाते, तर बीड विभागात मात्र त्याचा विपरीत अर्थ काढून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या कामगिरीपासून वंचित ठेवले जाते.
ते म्हणाले की, बदली कर्मचाऱ्यांना कोणतेही अतिरिक्त भत्ते किंवा विशेष सुविधा नकोत. त्यांना फक्त महामंडळाच्या परिपत्रकानुसार मिळणारे हक्क आणि समान वागणूक हवी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी आंदोलन उभारण्यास संघटना मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या कार्यक्रमात अनेक कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाला राजेंद्र वाहटुळे, विशाल कांबळे, विजय जगताप, अभिजित सूर्यवंशी, अशोक महानोर, शेषराव नागरगोजे, ईश्वर माळवाले, भगवान गर्जे, श्रीकृष्ण येवले, विकास गीते, बाळकृष्ण पेंटुळे, गजानन गिराम, राजकुमार आंधळे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा