Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राजकीय भूकंप! शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंचे सूचक विधान

Maharashtra Breaking News- याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि या मोठ्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 12, 2026 | 09:48 AM
Maharashtra Politics:  राजकीय भूकंप!  शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंचे सूचक विधान
Follow Us
Follow Us:
  • शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मूळ काँग्रेस पक्षात संभाव्य विलीनीकरण
  • काँग्रेस हायकमांडने हर्षवर्धन सपकाळ आणि नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलावणे
  • सेक्युलर मतांचे विभाजन थांबवण्यासाठी आणि देश-संविधान वाचवण्यासाठी सेक्युलर विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू
Maharashtra Politics: पश्चिम बंगालमधील दारूण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार असल्याची बातमी समोर आली होती. ही बातमी ताजी असतानाच आता महाराष्ट्रातील असाच एक मोठा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना शह देत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला आगामी काळात रोखण्यासाठी विरोधी गोटात अत्यंत मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याच्या चर्चेने सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विलीनीकरणाबाबत अतिशय गांभीर्याने विचारमंथन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि या मोठ्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही काँग्रेस हायकमांडने दिल्ली वारीचे फर्मान सोडल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावून चर्चा केली जात असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) काँग्रेसमधील विलीनीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय समीकरणे आणि आघाड्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होती. पण काही कारणास्तव निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणात जे काही चाललं आहे.देशाची सैंविधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशातच सेल्युलर मतांचे विभाजन थांबवण्यासाठी, देश आणि संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहेत, त्यांनी एकत्रित आले पाहिजे, यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

भाजपला रोखण्यासाठी देशपातळीवर आघाडी उभी करण्यासाठी पवार साहेब, तृणमूल काँग्रेस हे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या मानसिकतेती आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या सगळ्यांकडून त्यासंदर्भात विचारमंथन सुरू आहे. सेक्युलर मतांना एकत्रित करून आता मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हा एकमेव अजेंडा आहे. मोदी सरकारकडून देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याच आणि त्याची पाळंमुळ खोदण्याचं काम सुरू आहे,अशी टीकाही नाना पटोले यांनी यावेळी केली.

NCP Merger in Congress: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसपासून वेगळे झालेले समविचारी पक्ष पुन्हा काँग्रेससोबत एकत्र यावेत, असे मत व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “भाजपविरोधी राजकारण अधिक प्रभावी करण्यासाठी काँग्रेसची ताकद वाढवणे आवश्यक आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केलेल्या नेत्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार करावा आणि त्यासाठी पुढाकार शरद पवार यांनी घ्यावा, असेही त्यांनी म्हटले होते.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची सावध प्रतिक्रिया

राऊत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील प्रमुख नेत्यांकडे या चर्चेबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. मात्र, पक्षातील नेत्यांनी कोणतीही ठाम भूमिका न मांडता अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांचाच असेल, असे स्पष्ट केले.

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “काँग्रेसमध्ये विलिनीकरणासंदर्भातील कोणताही निर्णय शरद पवार घेतील. त्यामुळे यावर मी भाष्य करणार नाही.” तर “आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. पक्षाच्या भविष्यासंदर्भातील निर्णय शरद पवार घेतील,” असे सांगत आमदार रोहित पवार यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.

सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा

खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चांबाबत सावध भूमिका घेतली. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत सध्या कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या केवळ राजकीय पातळीवरील अंदाज आणि शक्यतांपुरत्याच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.

निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भविष्यासंदर्भात विविध चर्चा सुरू असल्या तरी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी अंतिम निर्णयाचा अधिकार शरद पवार यांच्याकडेच असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावर शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Big political reshuffle sharad pawars ncp to merge with congress soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Congress
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका
1

नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

२०१४ नंतर बदलली देशाची अस्मिता आणि…’, कार्यकाळाचे १२ वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला मोठे संबोधन
2

२०१४ नंतर बदलली देशाची अस्मिता आणि…’, कार्यकाळाचे १२ वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला मोठे संबोधन

Sharad Pawar News: पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे पण; नेहरू-इंदिरा गांधींच्या योगदानावरून शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
3

Sharad Pawar News: पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे पण; नेहरू-इंदिरा गांधींच्या योगदानावरून शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Congress Politics: राजकारणात भूकंप! मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार? सोनिया गांधींचा प्रस्ताव
4

Congress Politics: राजकारणात भूकंप! मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार? सोनिया गांधींचा प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.