
खामगावात ढगफुटीसदृश पाऊस; जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यांना फटका
७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पैरणी कारण्यात आली होती. बोगस बियाणे व प्रारंभी झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट आले होते. अगोदरच अल मिनीच्या प्रभावामुळे उशिराने आलेल्या पाचसाने खरीप पेरण्या रखडल्या होत्या. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आणि खरीप पेरण्यांना वेग आला होता. त्यानंतर अधूनमधून कोसळणाऱ्या सरीनी खरीप पिक जामात होती, मात्र गत दोन आठवड्यापासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंचेचे जग दाटून आले होते. खरीप पिकांना जगविण्यासहठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची आस लागलेली असतानाच, २९ आणि ३१ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली, धो-धो कोसळलेल्या पावसामुळे काही भागातील पिकांना संजीवनी मिळाली.
जिल्ह्यात दोन दिवस संततधार झालेल्या पावसामुळे बुलढाणा तालुक्यात सोयाबीन, तूर, मका, चिखली तालुक्यात सोयाबीन, भाजीपाला, हळद, मलकापूर तालुक्यात सोयाबीन, कापूस, मका, तुर, ऊस, खामगाव तालुक्यात भाजीपाला, शेगाव तालुक्यात सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मुग, नांदुरा तालुक्यात सोयाबीन, कापूस, मका, भाजीपाला, जळगाव जामोद कापूस, तुर, उडीद, मुग, सोयाबीन, भाजीपाला, संग्रामपूर तालुक्यात कापूस, तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भाजीपाला या पिकाचे तर मेहकर तालुक्यात सोयाबीन आणि तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
तालुका – बाधित गावे – पिकाचे बाधित क्षेत्र सेक्टर