
Buldhana Farmers Kharif Crop Damage
आता केवळ कपाशी आणि तूर पिकावर ज्या काही आशा उरल्या आहेत, त्या केवळ परतीच्या पावसावर आहे.शेती पूर्णतः निसर्गाच्या भरवशावर विसंबून आहे. त्यातही कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. अशा नैसर्गिक संकटाच्या मालिकेत देखील शेतकरी धनधान्य पिकविण्यासाठी धडपडत असतो. निसर्गाच्या चक्रव्यूहातून जो काही माल हाती येतो त्याला बाजारात देखील भाव मिळत नसल्याने शेती शेतकऱ्यांसाठी फायद्यापेक्षा तोट्याची ठरत आहे.
कापसाचे क्षेत्र सुमारे १ लाख ३५ हजार हेक्टर आहे. काही भागात कापसाची वाढ समाधानकारक असली तरी पावसातील खंडामुळे बॉडधारणा आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तुरीचे क्षेत्र सुमारे ९९ हजार ५२२ हेक्टर असून, या पिकालाही शेवटच्या टप्प्यात ओलावा आवश्यक आहे. पावसाअभावी तूर, मूग आणि उडिदाच्या पिकांवरही परिणाम झाल्याच्या नोंदी आहेत. आता परतीच्या पावसाच्या सरी झाल्यास उशिराच्या पिकांना काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा खंड कायम राहिल्यास उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांवरील संकट तीव्र झाले. २ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ८७ टक्के कमी असल्याची नोंद करण्यात आली.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा विविध शेतकरी संघटना व स्थानिक प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. जिल्ह्याचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत समावेश करावा, पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी