
अतिवृष्टीचा बसला ८५ हजार हेक्टरमधील पिकाला फटका, बुलढाण्यातील ४९५ गावे बाधित; अतोनात नुकसान
जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. पैनगंगा नदीचा प्रवाह वेगाने सुरू झाल्याने मलकापूर सोलापूर महामार्ग ठप्प झाला होता. घटनास्थळी पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बुलढाणा शहरासह लगतच्या गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातही १०० टक्के जलसाठा प्राप्त झाला. पाण्याचा विसर्ग सतत सुरू असल्याचे दिसून आले. पेनटाकळी प्रकल्पाखालील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दुसरीकडे घाटाखालील जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर या भागातीलही ग्रामीण वस्तीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, शेती शेतीपिकांचे नुकसान झाले.
३० आणि ३१ जुलैदरम्यान जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस झाला, जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक २०७.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल नांदुरा १७४.८ मिमी. खामगाव १५२.१ मिमी, शेगाव १३९.७ मिमी, मलकापूर १३७.२ मिमी, संग्रामपूर ११७.८ मिमी, मेहकर १११ मिमी, चिखली १०९.८ मिमी, मोताळा १०६.७ मिमी, बुलढाणा १०४.८ मिमी, लोणार १०० मिमी, सिंदखेडराजा ९८.१ मिमी आणि देऊळगाव राजा ८२.५ मिमी पावसाची नोंद झाली.
मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट