
photo- yandex
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ६५ आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांनी योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यापूर्वीच्या वर्षातील ३० दाम्पत्यांचे अर्जही प्रलंबित असल्याने अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभाच्यांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना शासनाच्या या योजनेमुळे आर्थिक मदत मिळते. त्यामुळे विवाहानंतरच्या सुरुवातीच्या काळात ही मदत महत्त्वाची ठरते. मात्र, अर्ज सादर करूनही अनुदानाला विलंब होत आहे.
लाभ मिळविण्यासाठी संबंधित दाम्पत्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि संयुक्त बैंक खात्याचे झेरॉक्स जोडाची लागते.
विवाहबद्ध झालेल्या या जोडप्यांना सुरुवातीच्या काळात शासनाकडून दिले जाणारे ५० हजारांचे अर्थसहाय्य हे महत्त्वपूर्ण ठरते.
संबंधित विभागाला शासनाकडून ३० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लवकरच या निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे, संबंधित विभागाकडून दैनिक नवराष्ट्र प्रतिनिधी बोलताना सांगितले.
जि. प.. बुलढाण्याचे, प्रभारी समाज कल्याण अधिकारी,प्रमोद एंडोले म्हणाले की, 66 शासनाकडून ३० लाखांचा निधी मिळाला, परंतु, निधीची अधिक आवश्यकता असल्याने निधीरखठी मागणी केलेली आहे. पुढील महिन्यात निधी प्राप्त झाल्यानंतर गतवर्षीच्या ३० आणि यावर्षीच्या ६५ दाम्पत्यांना निधीचे वाटप करण्यात येईल.