बुलढाणा जिल्ह्यातील एसटी बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिस आणि आरटीओच्या संयुक्त पथकांकडून जिल्हाभरात कठोर कारवाई केली जात आहे.
वाढती महागाई, इंधन टंचाई, शेतीमालाला मिळणारे कमी भाव, नीट पेपरफुटी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अश्यातच आज (सोमवार, १ जून) सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सरकारच्या भूमिकेमुळे बुलढाणा शहरात भव्य आसूड मोर्चाचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले.
केंद्र सरकारच्या फूड स्ट्रीट योजनेअंतर्गत शेगाव आणि शिर्डी येथे आधुनिक फूड स्ट्रीट हब उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये, असा एकूण 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्ञानगंगा अभयारण्य येथे बुद्ध पौर्णिमा निमित्ताने वन्यप्राणी गणना उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात ४४ मचाण व ४४ कॅमेऱ्यांद्वारे वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात आले.
‘शिवाजी कोण होता?’ या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून संजय गायकवाडांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
दिवंगत गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली होती.
देऊळगाव राजा येथील व्यंकटेश महाविद्यालय येथे भित्तीपत्रक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.
राज्यातील गॅस तुटवडा व दरवाढीविरोधात Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) महिला आघाडी आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाण्याची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. १२० कृत्रिम पाणवठे आणि १६ नैसर्गिक जलस्रोतांद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू आहे.
बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (३९) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आईला फोन करून “हा माझा शेवटचा फोन आहे” असे सांगितले.