Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकरी राजा हवालदिल; इस्लामपुरात राष्ट्रवादीकडून बैलगाड्या-ट्रॅक्टर मोर्चा

सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गावांचा विकास ठप्प झाला असून, शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. राज्य सरकार व प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना व शेतकऱ्यांच्या विविध अनुदानाचा निधी तातडीने द्यावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 03, 2025 | 11:37 AM
सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकरी राजा हवालदिल

सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकरी राजा हवालदिल

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व माजी मंत्री जयंत पाटील समर्थक सरपंचांनी इस्लामपूर येथे भव्य बैल गाड्या व ट्रॅक्टर मोर्चा काढून वाळवा पंचायत समितीवर जोरदार धडक दिली. सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गावांचा विकास ठप्प झाला असून, शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. राज्य सरकार व प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना व शेतकऱ्यांच्या विविध अनुदानाचा निधी तातडीने द्यावा. अन्यथा सरकार आणि प्रशासनाच्या उरात धडकी भरेल, असा मोर्चा काढू, असा इशारा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, कामेरीचे सरपंच रणजित पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. येथील तहसील कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून बैल गाड्या व ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात झाली.

गांधी चौक, संभाजी चौक, आझाद चौक, झरी नाका मार्गे पंचायत समितीमध्ये मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले भाजप आमदार बबनराव लोणीकर व राज्य सरकारचा प्रमुख पदाधिकऱ्यांनी चांगला समाचार घेतला.

या आंदोलनात राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, संचालक शैलेश पाटील, बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आटूगडे,आष्ट्याचे दिलीपराव वग्याणी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत

शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २० कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

Web Title: Bullock cart tractor march by ncp in islampur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Islampur
  • Maharashtra Politics
  • NCP Politics

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.