Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या सरकारवर नाराजी तर तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांवर फुलांची उधळण, सीमा वादात अडकलेल्या गावातील नागरिकांच्या नक्की मनात काय?

महाराष्ट्र सरकार कमी पडलं. केवळ जमिनीचे पट्टेच नाही तर या गावांना पाणी पुरवठा, व्यक्तिगत योजनांची तात्काळ अंमलबजावणी, गाव विकासाची योजना राबवण्यातही तेलंगणा सरकार अग्रेसर ठरलं.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 14, 2023 | 05:53 PM
महाराष्ट्राच्या सरकारवर नाराजी तर तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांवर फुलांची उधळण, सीमा वादात अडकलेल्या गावातील नागरिकांच्या नक्की मनात काय?
Follow Us
Follow Us:

चंद्रपूर : महाराष्ट्र असो वा कर्नाटक, सीमा वादाचा प्रश्न हा गंभीर राहिला आहे. मात्र एखाद्या सरकारवर गावकरी फुलांची उधळण करतात अन दुसऱ्या सरकारवर शाब्दिक दगडफेक करत असतील, तर अश्या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने बघायला हवं. शोकांतिका अशी की, खुर्चीच्या राजकारणाची नशा डोक्यावर चढलेल्या सरकारला हे दिसतच नाही. न्यायालयीन महाराष्ट्र सरकारच्या बाजूने निकाल दिला असला तरी महाराष्ट्राच्या भूमीवर असलेल्या इथल्या माणसाच्या हृदयात तेलंगणा सरकारन घर केलं आहे. याला कारण ठरलं ते म्हणजे तेलंगणा सरकारची विकासयोजना. सीमा वादात अडकलेल्या या गावांनी महाराष्ट्र सरकारची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. महाराष्ट्र – तेलंगणा सरकार ज्या गावावर आपला अधिकार सांगतात, ते गाव महाराजगुडा. काय म्हणतात इथले गावकरी ? नेमकं काय आहे प्रकरण? तुम्हीच वाचा…

बेळगाव प्रमाणेच महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या वादग्रस्त साडेबारा गावांचा प्रश्न गंभीर आहे. या गावातील कुटूंबियांनी पिढ्यानपिढ्या कसलेल्या वन जमिनीचे पट्टे तेलंगणा सरकारने वितरित केले आहेत. ६१७ शेतकऱ्यांना वैयक्तिक वनहक्काचे पट्टे मिळाले आहेत. या गावातील नागरिकांची ही मुख्य मागणी होती. ही मागणी पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार कमी पडलं. केवळ जमिनीचे पट्टेच नाही तर या गावांना पाणी पुरवठा, व्यक्तिगत योजनांची तात्काळ अंमलबजावणी, गाव विकासाची योजना राबवण्यातही तेलंगणा सरकार अग्रेसर ठरलं. तेलंगणा सरकारच्या योजनांचा लाभ घेत गावकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावली, दुसरीकडे त्यांच्या मूलभूत गरजा ही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या गावातील नागरिक तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची वाहवा करताना थकत नाहीत. याच वेळी महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रियतेवर ते तिखट प्रतिक्रिया देतात.

या गावातील नागरिक दोन्ही गावातील रहिवासी…
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील या साडेबारा गावातील नागरिक महाराष्ट्र – तेलंगणाचे रहिवासी आहेत. प्रत्येक नागरिकांकडे दोन्ही राज्याचे आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र आहे. निवडणुकीत दोनदा या गावातील नागरिक मतदानाचा अधिकार बजावतात.

काय होता न्यायालयाचा निकाल…
महाराष्ट्र – तेलंगणा सिमावादाचा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला होता. १७ जुलै १९९७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रात असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला. त्यामुळे २१ ऑगस्ट १९९७ ला आंध्रप्रदेश सरकारने दाखल केलेली रिट याचिका मागे घेतली. आंध्र प्रदेशचे विभाजन झाले आणि तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. न्यायालयाच्या निकाल लागलेला असतानाही तेलंगणा सरकारने या गावावर आपला दावा केला. या गावात तेलंगणा राज्य सरकार आपल्या योजना राबवित असतो.

कुणाचा फायदा, कुणाचा तोटा…
या भूभागावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. इथं खनिज संपत्ती ही विपुल असल्याचं बोललं जातं. या गावातील नागरिकांना आपल्या बाजूने उभ करण्यात तेलंगणा सरकार यशस्वी झाले आहे. ही गावे तेलंगणा राज्यात समाविष्ट झाली तर, या भागात असलेल्या वनसंपत्ती खनिज संपत्तीवर तेलंगणा सरकार दावा करू शकते.

सीमा वादात अडकलेल्या गावांची ही आहेत नावे
परमडोली, तांडा, कोटा, मुकादमगुडा, महाराजगुडा, इंदिरानगर, अंतापूर, शंकरलोधी, पद्मावती, पळसगुड, भोलापठार, येसापूर, लेंडीगुडा, लेंडीजाळा ही गावे सीमा वादात अडकली आहेत. यातील कोटा या गावातील वस्ती हटली आहे तर महाराजगुडा हे अर्धे गाव महाराष्ट्रात तर अर्धे तेलंगणामध्ये आहे.

या गावांना मिळालेले जमिनीचे पट्टे…
पदमावती, अंतापूर, इंदिरानगर, महाराजगुडा, परमडोली तांडा, शंकरलोधी, भोलापूर येथील अनु जमातीच्या ६१७ शेतकऱ्यांना वनहक्क समितीच्या माध्यमातून वैयक्तिक वनहक्काचे पट्टे वितरीत करण्यात आले आहेत.

Web Title: Chandrapur maharashtra government karnataka telangana government maharajguda government of india chandrapur people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2023 | 05:53 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Government of India
  • india
  • Karnataka
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण
1

Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण

१३ दिवसांच्या चिमुकलीची वडिलांकडून हत्या; पाण्याच्या टाकीत फेकून संपवलं, आईच्या तक्रारीवर आरोपीला अटक
2

१३ दिवसांच्या चिमुकलीची वडिलांकडून हत्या; पाण्याच्या टाकीत फेकून संपवलं, आईच्या तक्रारीवर आरोपीला अटक

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
3

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chandrapur News: पहिल्याच पावसात राजुरा सर्व्हिस रोडची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला
4

Chandrapur News: पहिल्याच पावसात राजुरा सर्व्हिस रोडची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.