
Chandrapur News: ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ! 2100 रुपयांचे आश्वासन हवेतच, 50 हजार महिला अपात्र
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ही योजना जुलै २०२४ ला सुरू केली. योजनेच्या प्रमुख उद्दिष्टानुसार आर्थिक स्वावलंबन अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० (वर्षाला १८ हजार रुपये) देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचे उदिष्ट होते. महागाईच्या काळात घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाला आधार म्हणून हे पाऊल राज्य शासनाने उचलले. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा, घटस्फोटित, आणि निराधार महिलांना मिळत आहे. असे असले तरी गत २. ३ महिन्यांपासून अनेक महिलांना लाभा मिळालेला नसल्याने व शासनाकडून मिळालेल्या २१०० रुपयाच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटता असल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ४ लाख ९२ हजार ९५१ अर्ज प्राप्त झाले. यातील ४ लाख ४२ हजार ९०५ अर्ज पात्र ठरले तर, ५० हजार ०४६ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. ४५८ लाभार्थी २१ वर्षाखालचे असल्यानं, २९६२ लाभार्थी ६५ वरील असल्याने, ४३ हजार २२६ लाभार्थीचे इकेवायसी न झाल्याने तर इतर १९२ लाभार्थी असल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. यामुळे एकूण ५० हजार ०४६ महिला बाद झाल्या.
३ ते ४ महिन्यांपासून बहिणीचा हप्ता आलेला नाही. माझ्यासह गावातील अनेक गरजू महिलांना हप्ता मिळाला नाही. ज्या महिलांना आवश्यकता नाही, त्यांना लाभ मिळत असून मौल मजुरी करून जगणाऱ्या महिलांना हप्ता मिळत नाही. निवडणुकीपुरता घोषणा केल्या. आता वाऱ्यावर सोडलेले आहे. – रंजना गुरनुले, नागाळा
शासनाने विधानसभा निवडणुकीसाठी योजना सुरू केली. मध्यंतरी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्यापही आमच्या खात्यात फक्त १५०० रुपये प्रमाणेच हप्ता जमा होत आहे. त्यामुळे शासनाने वाढती महागाई लक्षात घेता २१०० रुपये प्रमाणे हप्ता द्यावे. – प्रियंका कांबळे, चंद्रपूर
Mira Bhayander : “काळ आला पण वेळ नाही”; परिसरात दुहेरी संकट, एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग
सध्या सिलिंडर, तेलाच्या किमतीसह अनेक वस्तूंची महागाई वाढलेली आहे शासनाने २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शासनाने बहिणीचा विचार करायला हवा. मतदानापूर्वी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे शासनाने कुठेतरी आश्वासनांची पूर्तता करून बहिणींना दिलासा द्यावा.- सविता बोरूले, चिमढा