चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आधार क्रमांकातील गंभीर तांत्रिक त्रुटीमुळे तब्बल 12 वर्षांपासून सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही. पीएम किसान, नमो शेतकरी आणि इतर डीबीटी अनुदानाची रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होत असल्याचा आरोप समोर आला आहे.
नागभीड शहरात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्ता काही दिवसांतच पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पेव्हर ब्लॉकची सुविधा उपलब्ध असतानाही थेट रस्ता फोडल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Chandrapur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंधन वाचवा, पेट्रोल-डिझेल वाचवा’ असे आवाहन केले आहे. निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी इंधनाचा वापर होतो.
चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे वाढत्या उष्णतेने नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. सलग दोन दिवस 46 ते 47 अंशांदरम्यान तापमान नोंदवले गेल्याने विदर्भात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्युटी व्यवस्थापन, रजा मंजुरी आणि कथित दबावाच्या आरोपांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
चंद्रपूरच्या मूल शहरातील ऐतिहासिक तलावावर प्रस्तावित मालधक्का प्रकल्पामुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणासोबतच ढिवर समाजाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जंगलालगतच्या भागातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक घेणे कठीण झाले असून, दरवर्षी हत्तींकडून पिकांचे नुकसान होत आहे.
गडचांदूरमध्ये गॅस एजन्सीच्या गैरप्रकारांमुळे ग्राहकांची लूट होत असून प्रशासनाकडून कारवाईला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने छापा टाकून तपासणी केली.
महाराष्ट्र सरकारने बाल संगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मासूम’ प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम आता राज्यभरातील १२१ संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
धानोरा परिसरातून अत्यंत दुर्मिळ शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. वर्धा नदीकाठी सापडलेल्या जीवाश्म, मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन साधनांमुळे हा परिसर हजारो वर्षांपूर्वी मानवाच्या वस्तीचा भाग होता, असे संकेत मिळत आहेत.
नागभीड येथे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. या स्वागत समारंभाच्या तयारीत घरचे सर्वच गुंतले होते. त्यात स्नेहाचाही समावेश होता.