‘लाडकी बहीण’ योजनेत मानधन 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यातच सुमारे 50 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याने लाभार्थींमध्ये नाराजी वाढली आहे.
चंद्रपुरातील ग्रामस्थ अजूनही 'बिबट समस्यामुक्त ग्राम' योजनेची अंमलबजावणी कधी होणार याची प्रतिक्षा करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या 5 वर्षांमध्ये 200 जणांचा मृत्यू झालाचा अहवाल समोर आला आहे.
सोलार बोरवेलच्या मदतीने पाणीपुरवठा करून वाघांसह इतर प्राण्यांना मोठा दिलासा देण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. यासाठीच बफर क्षेत्रात वन्यजीवांसाठी 617 कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
लाखो रुपये खर्चूनही रस्ता खड्डेमय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक ठिकाणी उखडलेल्या रस्त्यावर केवळ ऑइलमिश्रित डांबराचा पातळ पापुद्रा टाकून दुरुस्ती केल्याचा देखावा करण्यात येत आहे.
ST बसमध्ये सवलतीचा प्रवास आता कटकटीचा होणार आहे. कारण एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी वृद्धांना तासंतास रांगेत थांबावे लागत आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन तयार आहे. ३ टप्प्यांत कृती आराखडा लागू केला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पाणीपुरवठा होईल, यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली.
Chandrapur जिल्ह्यात सुमारे 300 वाघांसह मोठी वन्यजीव संख्या आहे. वनक्षेत्र अपुरे व मानवी हस्तक्षेप वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. 2025 मध्ये 49 जणांचा बळी गेला असून वाघांचाही मृत्यू वाढला आहे.
सरकारने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे. कर्जमाफीबाबत अद्याप शासनाने योजना जाहीर केलेली नाही.
Chandrapur-Yavatmal सीमेवरील Painganga Riverवरील गांधीनगर–तेजापूर घाटावर आजही पूल नाही. नागरिकांना नावेतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. बॅरेज कम पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दारूच्या वादातून 19 वर्षीय मुलाने नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळून खून केला. भिसी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू आहे.
चंद्रपूर येथे रेल्वेत टीसी नोकरीचे आमिष दाखवून 15 तरुणांकडून 1.31 कोटी रुपये उकळल्याचा प्रकार उघड. रामनगर पोलिस ठाणे येथे तिघांविरुद्ध गुन्हा; आरोपी पसार, पुढील तपास सुरू.
चपराळा अभयारण्यात हरीण, चितळ, सांबर, अस्वल, रानकुत्रे, बिबट, वानर तसेच विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. लगाम नाक्यापासून आष्टीपर्यंत सुमारे १८ किलोमीटरचा ३५३सी हा महामार्ग अभयारण्याच्या हद्दीतून जातो.
चंद्रपूर येथील कथित किडनीतस्करी प्रकरणात आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या जामीनावर सुनावणी पुढे ढकलली. तपासात असहकार्य केल्याचा पोलिसांचा दावा असून ‘थोटा’ कायद्यानुसार कारवाईला राज्याची मान्यता मिळाली; पोलिस कोठडीची तया