Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार

चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वाघसंख्या असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 15, 2025 | 03:51 PM
Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार

Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार

Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रपुरात मानव–वन्यजीव संघर्ष शिगेला!
  • गुंजेवाही व कन्हाळगावातील मृत्यूमुळे उडाली खळबळ
  • वर्षभरात 44 जणांचा बळी
जिल्ह्यात गत काही वर्षात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला गेला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातील लोक विशेषतः शेतात काम करणारे आणि गुराखी हे बळी पडतात. मानव-वन्यजीव संघर्षाने आता रौद्र रूप धारण केले असून अनेक घटना घडत असतात. शनिवारी (दि. १३) सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे शेतात कापूस व तुरी तोडण्यासाठी गेलेल्या छाया अरूण राऊत (४७) या महिलेवर वाघाने हल्ला केला, ज्यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला. सतत घडणाऱ्या घटनांमुळे मानव वन्यप्राणी संघर्ष नित्याचाच भाग झाला आहे.

Raigad News: जासई परिसरात ‘दि. बा. पाटील’ नावाचे फलक झळकले, आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता

छाया उर्फ अरुणा राऊत या नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी व तुरीसाठी गेल्या होत्या. दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. सायंकाळी ६ वाजले तरीही त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. परिसरातील काही नागरिकांना घेऊन शेतात गेले असता, शेताजवळच रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती सिंदेवाही वनविभागाला तसेच पोलिसांना देण्यात आली.

घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. तपासणी करून मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृताच्या कुटुंबीयांना वनविभागाने तातडीची २५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली आहे. हल्लेखोर वाघाची प्रतिमा टिपण्यासाठी वनविभागाने परिसरात कॅमेरे बसविले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे व गस्त वाढविण्यात आली आहे. यावेळी हल्लेखोर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी गुंजेवाही येथील ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

वर्षातील ४३ वा बळी

जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४३ वा बळी आहे. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३९, बिबटे २, अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी एक असे एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेती, पशुपालनासह अनेक व्यवसाय अडचणीत आलेले आहेत.

रामपुरी परिसरात वाघाच्या दहशतीचे सावट

ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी परिसरात गत काही दिवसांपासून वाघाचा मुक्तसंचार सुरू असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २ दिवसांपूर्वी गावालगतच्या शिवारात वाघाने रानडुकराची शिकार केली होती. त्या मृत डुकराला खाण्यासाठी वाघ पुन्हा पुन्हा त्या परिसरात येत असल्याची माहिती समोर येत आहे. वनविभागाने तातडीने पथके रवाना करून वाघाला मानवी वस्तीकडून दूर उसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू केले. तरीही वाघाच्या वावरात विशेष घट न झाल्यामुळे रामपुरीसह आसपासच्या गावांतील नागरिक चिंतेत आहेत.

गुरे चारतांना वाघाने केला हल्ला

गुरे चराई करण्यासाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मूल तालुक्यातील कन्हाळगाव येथील कक्ष क्र. 1765 येथे घडली. पितांबर गुलाब सोयाम (37, रा. बेलघाटा) असे मृत गुराख्याचे नाव आहे. पितांबर हे शनिवारी दुपारच्या सुमारास गुरे चराईसाठी जंगलात घेऊन गेले होते. सायंकाळ होऊनही ते घरी परत आले नाही, यामुळे कुटुंबीयांनी गावात आणि परिसरात शोधाशोध केली. मात्र, कुठेही आढळून नाही. दरम्यान कुटुंबीयांनी वन विभागाला माहिती दिली.

Sanjay Raut News: ‘विरोधी पक्षनेत्यापासून वेगळ्या विदर्भापर्यंत…; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले

रविवारी गावकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात जाऊन शोध मोहीम राबवली असता कन्हाळगाव विटातील कक्ष क्रमांक 1765 येथे वाघाच्या हल्ल्यात पितांबरचा नाहक जीव गेल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या पथकाने सदर घटनेचा पंचनामा करून मृत्तदेह उपजिल्हा रुग्णालय मूल येथे शवविच्छेदनाकरिता पाठविले. घटनास्थळाला सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी भेट देऊन कुटुंबीयांना तत्काळ ४० हजार रुपयाचे आर्थिक मदत केली आहे.

चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वाघसंख्या असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गत काही महिन्यांत मानव-वन्यजीव संघर्षाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढली असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण, योग्य भरपाई, प्रतिबंधात्मक उपाय योजना याबाबत शेतकरी सातत्याने मागणी करत असले तरी हल्ल्यांची मालिका थांबलेली नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गत ५ वर्षामध्ये मानव वन्यप्राणी संघर्षामध्ये २०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मात्र हा संघर्ष रोखण्यात वनविभाग अपयशी ठरला असून अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

Web Title: Tiger attacks are increasing in chandrapur citizens were scared chandrapur news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • tiger

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
1

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु
2

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण
3

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात
4

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.