भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना निकृष्ट दर्जाचे मांस खाण्यास दिले जात आहे. योग्य प्रमाणात मांस पुरवले जात नसल्यामुळे प्राणी कुपोषित होऊ शकतात.
केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार या प्रकल्पात ठरावीक संख्येने वाघांचे पुनर्वसन करण्याची योजना आहे. त्याअंतर्गत काही मादी वाघीणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प येथून आणण्यात आल्या आहेत.
भंडाऱ्यातील साकोली परिसरात वाघाच्या हल्ल्यांनी 15 दिवसांत 2 जणांचा बळी घेतला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभाग प्रयत्न करत असला तरी वाघ अद्याप जेरबंद झाला नाही.
सोलार बोरवेलच्या मदतीने पाणीपुरवठा करून वाघांसह इतर प्राण्यांना मोठा दिलासा देण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. यासाठीच बफर क्षेत्रात वन्यजीवांसाठी 617 कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Chandrapur जिल्ह्यात सुमारे 300 वाघांसह मोठी वन्यजीव संख्या आहे. वनक्षेत्र अपुरे व मानवी हस्तक्षेप वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. 2025 मध्ये 49 जणांचा बळी गेला असून वाघांचाही मृत्यू वाढला…
White Lion Viral Video : दुर्मिळ पांढरा वाघ भुकेने झाला व्याकुळ, शरीर थकलं तरी डोळ्यात दिसतेय जेवणाची आस... पटणा प्राणीसंग्रहातील वाघाचा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या वेगाने शेअर केला जात आहे.
Tiger Viral Video : भक्तीसमोर शक्तीही नतमस्तक होते...! जंगलाचा धोकादायक शिकारी वाघ शंकराच्या भेटीला आला. पिंडीसमोर जाताच त्याने नतमस्तक केले आणि दृष्य पाहून युजर्स अवाक् झाले.
'हिरकणी'चा वावर पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. वाघिणीला कोणताही त्रास न देता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्याघ्न संघर्षांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारतर्फे गठीत ११ सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे अन्नत्याग सत्याग्रह करणार आहे.
नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संशयास्पद व्हिडिओ किंवा संदेशांची खातरजमा केल्याशिवाय ते पुढे पाठवू नयेत, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.
सन २०१७ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्प’ हाती घेण्यात आला.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १७ जानेवारीदरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अखिल भारतीय व्याघ्र गणना (फेज १) झाली.
आपण समाजामुळे शिकतो, त्यामुळे समाजाला काहीतरी परत देणं आपलं कर्तव्य आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांनी संवर्धनाच्या कार्यात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण तज्ज्ञांचा विरोध असून देखील ताडोबा खाण प्रकल्पावर मंजूरी दिली. याच निर्णयामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. हा निर्णय म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला उध्वस्त करणारा निर्णय, असं वन्यजीव प्रेमींचं म्हणण…
राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ज्ञांचा विरोध असूनही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिसंवेदनशील कॉरिडॉरमध्ये लोहखनिज खाण प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. यामुळे ताडोबातील 75 वाघांच्या अस्तित्वावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आ
केंद्राची संसदीय पॅनल समिती ताडोबा आणि नागपूरच्या ३ दिवसीय दौऱ्यावर होती. यावेळी अधिकाऱ्यांनी पॅनलला खाणकामाच्या परिणामाबाबत माहिती दिली. ताडोबा-अंधारी प्रकल्पाचा केंद्राच्या संसदीय पॅनलने आढावा घेतला.
ताकदवान ताराने सर्व संकटांवर मात करत झोळंबी परिक्षेत्रात यशस्वी प्रवेश केला. विशेष म्हणजे, तिच्या गळ्यातील रेडिओ कॉलर पाण्याखाली असतानाही उत्तमरीत्या काम करत होती.
कोठारी वनपरिक्षेत्रालगतच्या शेतशिवारात वाघाच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.