सन २०१७ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्प’ हाती घेण्यात आला.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १७ जानेवारीदरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अखिल भारतीय व्याघ्र गणना (फेज १) झाली.
आपण समाजामुळे शिकतो, त्यामुळे समाजाला काहीतरी परत देणं आपलं कर्तव्य आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांनी संवर्धनाच्या कार्यात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण तज्ज्ञांचा विरोध असून देखील ताडोबा खाण प्रकल्पावर मंजूरी दिली. याच निर्णयामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. हा निर्णय म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला उध्वस्त करणारा निर्णय, असं वन्यजीव प्रेमींचं म्हणण…
राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ज्ञांचा विरोध असूनही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिसंवेदनशील कॉरिडॉरमध्ये लोहखनिज खाण प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. यामुळे ताडोबातील 75 वाघांच्या अस्तित्वावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आ
केंद्राची संसदीय पॅनल समिती ताडोबा आणि नागपूरच्या ३ दिवसीय दौऱ्यावर होती. यावेळी अधिकाऱ्यांनी पॅनलला खाणकामाच्या परिणामाबाबत माहिती दिली. ताडोबा-अंधारी प्रकल्पाचा केंद्राच्या संसदीय पॅनलने आढावा घेतला.
ताकदवान ताराने सर्व संकटांवर मात करत झोळंबी परिक्षेत्रात यशस्वी प्रवेश केला. विशेष म्हणजे, तिच्या गळ्यातील रेडिओ कॉलर पाण्याखाली असतानाही उत्तमरीत्या काम करत होती.
कोठारी वनपरिक्षेत्रालगतच्या शेतशिवारात वाघाच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Satara News: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीच्या घनदाट जंगलात उभारण्यात आलेल्या सुरक्षित कुंपणात प्रौढ वाघीण STR-05 उर्फ ‘तारा’ला सोडण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वाघसंख्या असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाघांच्या घटनांमुळे चंद्रपुर जिल्ह्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. २३ नोव्हेंबर रोजी वाघाने एका ५४ वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात वाघ-बिबट्या आणि मानव-पशुधन संघर्षामुळे १७,०४४ जणांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक कारणे, अपघात आणि शिकारीमुळे ११२ वाघ आणि ३९७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.