
निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल (Photo Credit- X)
निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ४, ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी गैरहजेरी लावल्याने मतदान व्यवस्थापन विस्कळीत झाले. मतदान केंद्रांवर मनुष्यबळाची कमतरता निर्माण होऊन प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे तपास करत असून दोषी आढळल्यास कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई होणार आहे.
इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणे ही दुर्मिळ घटना मानली जात असून यामुळे निवडणूक प्रक्रियेची शिस्त भंग करणाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. गंगापुरातील ही कारवाई निवडणूक व्यवस्थेतील शिस्त टिकवण्यासाठी प्रशासनाने उचललेले कडक पाऊल मानले जात आहे. “निवडणूक ड्युटीला गैरहजेरी चालणार नाही” असा स्पष्ट संदेश या घटनेतून देण्यात आला आहे.
काही शिक्षकांनी टीईटी परीक्षेचे कारण दाखवत निवडणूक कर्तव्य टाळल्याची चर्चा रंगली आहे. काहींनी चोगस प्रवेशपत्र सादर केल्याचा संशय व्यक्त होत असून चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.