
अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ (Photo Credit- X)
तापमानात घसरण पाहायला मिळाली. १२ मार्च रोजी ३९.८ अंशावर केलेले कमाल तापमान शुक्रवार, २० रोजी ३२. ६ अंशापर्यंत घसरले होते. शनिवारीदेखील ३३.२ अंशाची नोंद करण्यात आली. दरम्यान, आता अवकाळीचा प्रभाव संपला असून पुन्हा एकदा तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. रविवार, २२ रोजी यात वाढ होऊन कमाल ३४.६ तर किमान १७.८ अंशाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.
उन्ह वाढले कि पाऊस अपेक्षित असतो. हे दरवर्षीच होते, तापमान वाढल्याने यंदा मार्चमध्ये अवकाळीने हजेरी दिल्लीस अशीच स्थिती नाही अपेक्षित उदा
श्रीनिवास औंधकर (हवामान अभ्यासक)
पुढील काही दिवसात यात आणखी वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. मागील १० ते १२ वर्षांपासून शहराच्या उकाड्यात वाढ निदर्शनात येत आहे. सर्वत्र झालेले सिमेंट रस्ते, जागोजागी बसवलेले सिमेंटचे पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटच्या उंच इमारतींमुळे उष्णता वाढीस लागत आहे. शहरभर हीच स्थिती आहे. लहान गल्ल्यामध्येही सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहेत. तर मोकळ्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून सपाट करण्यात आलेले आहे. यामुळे कमाल तापमानात सातत्याने वाढ सुरु झाल्याचा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंटच्या रस्त्यांमुळे अधिक उष्णता निर्माण होते. अंदाजे १० ते १२ वर्षांपूर्वी बहुतेक ठिकाणी डांबरी रस्ते होते. या रस्त्यांतून उष्णता शोषली जात होतो. मात्र सिमेंट रस्त्यामुळे उष्णतेत वाढ सुरु झाली आहे.