
छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! (Photo Credit- X)
सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी जलवाहिनीच्या चेअरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर कंत्राटदार कंपनीचेतर्फे जेष्ठ विधीज्ञ अॅड. रमेश धोर्डे यांनी सांगितले की, सदरील सर्व दुरुस्ती कामे पुढील १० दिवसांत पूर्ण केली जातील. तसेच १९ मार्चपासून जॅकवेल कार्यान्वित होऊन पाणी उपसा सुरू होईल, असेही त्यांनी न्यायालयाला आश्वस्त केले. आयुक्तांनी ६ मार्च रोजी केलेल्या पाहणीचा अहवाल अॅड. संभाजी टोपे यांनी न्यायालयात सादर केला. यात मनपातर्फे अॅड. संभाजी टोपे, मजीप्रातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र देशमुख, एनएचएआयतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ संजीव देशपांडे, कंत्राटदार कंपनीतर्फे आर. एन. धोर्डे, अॅमीकस क्युरी म्हणून अॅड. शंभूराजे देशमुख आणि मूळ याचिकाकर्ते अॅड. मुखेडकर यांनी बाजू मांडली.
उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ ते १२ या वेळेत जॅकवेल आणि इतर कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. या पाहणीसाठी मनपा आयुक्त, मजीप्राचे अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित वकिलांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाहणीचा सविस्तर अहवाल १७ मार्चच्या सुनावणीत सादर करावा लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नळांना बसणार ‘मीटर’; राज्य सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी
संभाजीनगरकरांना चोवीस तास पाणी मिळण्याचे अनेकदा आश्वासन दिले जात होते. मात्र कधी राजकीय श्रेयवादावरून तर कधी प्रशासनाच्या चुकींमुळे शहरवासियांना वर्षातून अवघे १२० दिवस पाणी मिळत होते. समांतर जलवाहिनीचे काम कधी भूसंपादन तर कधी राजकीय वादामुळे पूर्णत्वाला जात नव्हते. निवडणुकीच्या तोंडावर पाणीप्रश्न पेटला होता. भाजपने हाच मुद्दा घेत शहरवासियांना भावनिक आवाहन करुन नववर्षात पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्या टप्प्यात किमान दोन दिवसाआड पाणी देण्याची तयारी करण्यात यश आले असून गुढी पाडव्याच्या दिवशी मोठ्या पंपातून पाणी उपसा करुन फारोळा शुध्दीकरण केंद्रात येईल.
हिंदू नववर्ष म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या गुढी पाडव्याला पाण्यासाठी ओरड थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जायकवाडीच्या नाथसागरात मुबलक पाणी असूनही संभाजी नगरकरांना टँकरवर तहान भागवावी लागत होती. कंत्राटदाराने न्यायालयात जलवाहिनीच्या काम नियोजित वेळेत पूर्ण करणार असल्याचे शपथपत्र दिल्याने नववर्षाच्या दिवशी पाणी उपसा करण्याचा मार्ग मोकळा झाला. महापालिकेवर भाजपचा महापौर बसल्यानंतर सर्वात आधी मोठे काम केले असेल तर पाणीप्रश्न निकाली काढला गेला.