Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ असा सवाल करत त्यांनी फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावं, अशी मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Sep 11, 2026 | 04:39 PM
Harshvardhan Sapkal Criticized CM Devendra Fadnavis

Harshvardhan Sapkal Criticized CM Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • ‘मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’
  • कायदा-सुव्यवस्थेवरून सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
  • ‘गृहमंत्री म्हणून फडणवीस फेल’; राजीनाम्याची मागणी
 

मुंबई : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?” असा सवाल करत सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरलं.

महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी मोठा दबदबा होता. मात्र गेल्या काही वर्षांत पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. पोलिसांचा वापर राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी आणि वसुलीसाठी होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज्यातील या परिस्थितीला देवेंद्र फडणवीस यांचा कारभार जबाबदार असल्याचं सपकाळ म्हणाले.

मंत्री अतुल सावे यांच्या भाऊ आणि पुतण्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याचा दाखला देत सपकाळ यांनी सरकारला सवाल केला. याआधी जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. “मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाने कुणाकडे पाहायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

राज्यात गुंडगिरी, ड्रग्ज आणि गँगस्टरचा मुद्दाही सपकाळ यांनी उपस्थित केला. राजकीय आश्रयामुळे गुंड आणि मवाली खुलेआम फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’च्या घोषणा करून प्रश्न सुटणार नाही; त्यासाठी ठोस राजकीय इच्छाशक्ती लागते, असा टोला त्यांनी लगावला.

पुणे पोलिसांवरूनही सरकारला घेरलं

पुणे पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत सपकाळ यांनी सरकारवर आणखी निशाणा साधला. अल्पवयीन आरोपींना कारच्या बॉनेटवर बसवून धिंड काढल्याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने केलेल्या शिफारशीचा त्यांनी उल्लेख केला. पुणे पोलिसांवरील ही कारवाई फडणवीसांच्या कारभाराची पावती असल्याचं ते म्हणाले.

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

‘फडणवीसांनी खुर्ची सोडावी’

अहिल्यानगर आणि जालना जिल्ह्यातील कथित मारहाणीच्या घटनांचाही सपकाळ यांनी उल्लेख केला. गोरक्षणाच्या नावाखाली नागरिकांना अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला.

एकूणच, महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरून काँग्रेसने महायुती सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं असून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत, त्यांनी खुर्ची सोडावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Web Title: Harshvardhan sapkals attack on devendra fadnavis law and order maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devendra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
1

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार
2

MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील
4

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.