
सिल्लोड-कन्नडमध्ये अवकाळीचा हाहाकार! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान
अंभई, रेलगाव, नानेगाव, घटांब्री, पांगरी आदी परिसरात अवकाळी पाऊस झाला. तर सिरसाळा तांडा परिसरात गारपीट झाली, अवकाळी पावसामुळे सोंगणीला आलेले गहु हरभरा, कादा, सूर्यफूल, मका पिकाचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
बुधवारी रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर रात्री उशिरापर्यंत विजांचा कडकडाट सुरूच होता. यामुळे शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलले गहू, हरभरा झाकताना मोठी दमछाक झाली. काढणीसाठी जवळ आलेला कांदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आडवे झाले.
सध्या बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाले होते. त्यातच आता पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याने जेमतेम आलेले पिके हातातून गेल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणी सापडले आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातुन होत
कन्नड (वा): शहरात विजांच्या रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास कडकडाटासह पाऊसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसाने शहरात सुरु असलेल्या सिद्दीक शाह बाबाच्या उर्सातील दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली. विजांच्या कडकडाटात शहरातील विजपुरवठा खंडीत झाला होता. तर पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्मण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.